शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

MAHAVITARAN ABHAY YOJNA : महावितरण अभय योजनेला अत्यल्प प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 12:58 IST

७६२ कोटींच्या थकबाकीपैकी केवळ ४३ कोटींची वसुली, ३१ मार्चअखेरची मुदत

पुणे : महावितरणच्या अभय योजनेत पुणे विभागात सुमारे सव्वासहा लाख अकृषक ग्राहकांकडील ७६२ कोटी मूळ थकबाकीपैकी केवळ ४३ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ही वसुली मूळ थकबाकीच्या सुमारे ६ टक्केच आहे. त्यामुळे या योजनेकडे थकबाकीदार ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. ही योजना आता ३१ मार्चपर्यंतच सुरू राहील, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतरही नवीन जागामालक किंवा ताबेदारांना जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो, थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे.

महावितरणने गेल्या सप्टेंबरमध्ये अभय योजना जाहीर केली होती. त्यात थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीज ग्राहकांसाठी ही योजना लागू होती. त्यावेळी विभागातील ६ लाख २९ हजार ८३ अकृषक ग्राहकांकडे ९०१ कोटी ९७ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. यातील मूळ थकबाकी ७६२ कोटी १९ लाख रुपये होती. या थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण व्याज व विलंब आकाराचे १३९ कोटी ७८ लाख रुपये माफ होणार होते. मात्र, या योजनेकडे थकबाकीदार ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. पुणे विभागामध्ये आतापर्यंत ३३ हजार ३०४ ग्राहकांनी अर्ज केले आहे. २९ हजार ५०१ ग्राहक सहभागी झाले आहेत. त्यापैकी १७ हजार २६१ वीजग्राहकांनी विजेची गरज नसल्याने योजनेचा लाभ घेऊन थकबाकीतून मुक्ती मिळविली आहे. तर १० हजार १३५ वीज ग्राहकांकडे विजेची पुनर्जोडणी करण्यात आली असून, ५ हजार ९०८ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.

योजनेत सहभागी झालेल्या या २९ हजार ५०१ थकबाकीदारांनी ४३ कोटी ११ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिल्ह्यात १२ हजार ९६ ग्राहकांनी २७ कोटी ५६ लाख, सातारा जिल्ह्यात १ हजार ६६७ ग्राहकांनी २ कोटी ९ लाख, सोलापूर जिल्ह्यात ४ हजार ७१९ ग्राहकांनी ४ कोटी २ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ६ हजार ४५३ ग्राहकांनी ६ कोटी ३६ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ४ हजार ५६६ ग्राहकांनी ३ कोटी ८ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के, तर उच्चदाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरुवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीदेखील सोय आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड