शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

स्मार्ट बनण्याच्या नादात मुलांना एकलकोंडेपण

By admin | Published: November 16, 2015 1:51 AM

सध्याची लहान मुलं स्मार्ट आहेत. पाचव्या, सहाव्या वर्षापासून कॉम्प्युटर आणि मोबाइल सहजपणे हाताळणं, फाडफाड इंग्रजी बोलणं, टीव्हीवरच्या डान्स किंवा कॉमेडी शोमध्ये भाग घेणं,

शिवप्रसाद डांगे,  रहाटणीसध्याची लहान मुलं स्मार्ट आहेत. पाचव्या, सहाव्या वर्षापासून कॉम्प्युटर आणि मोबाइल सहजपणे हाताळणं, फाडफाड इंग्रजी बोलणं, टीव्हीवरच्या डान्स किंवा कॉमेडी शोमध्ये भाग घेणं, अशीच स्मार्ट असण्याची परिभाषा आहे. ही मुले तासन्तास घरात टीव्ही व संगणकाच्या समोर बसून राहत आहेत. खरे तर शहरात सुरक्षेच्या कारणाने पालक मैदानी खेळ खेळण्यासाठी मुले बाहेरच पडू देत नाहीत. त्यामुळे स्मार्ट बनण्याच्या नादात मुलं एकलकोंडी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. स्मार्ट म्हणजे बुद्धिमान किंवा शहाणा नव्हे. हल्लीच्या परिभाषेत स्मार्ट असणं म्हणजे ‘चमको’ असणं. चारचौघांत इतरांपेक्षा उठून दिसणं. समाजात सहजपणे मिसळता येणं, कुणाशीही सहज बोलता येणं वगैरे. हल्लीच्या १0-१२ वर्षांच्या मुलांना हे सगळं करता येतं. इतकंच काय, याच वयात ती मोठ्यांप्रमाणे कपडे आणि केसांच्या फॅशन्स करण्यातही तरबेज बनतात. उदार पालक आणि समाजामुळे ते अमाप स्वातंत्र्य उपभोगत आहेत. त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि शिक्षण कमालीचे सोपं केले आहे. ते सहज उपलब्धही होते. उच्च शिक्षणाची संधीही सहजपणे मिळते. मात्र, एवढे सगळं मिळून या पिढीला दैनंदिन जीवनातले साधे-सोपे हिशेब, बेरीज आणि वजाबाकी तोंडी करता येत नाही. त्यासाठी कॅल्क्युलेटरची मदत घ्यावी लागते. अर्थात डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि मॉलच्या कॅश काउंटरवरील तरुण कर्मचाऱ्यांचेही काम कॅल्क्युलेटरविना चालत नाही. या पिढीच्या ह्यस्मार्टनेसह्णमधलं हे मोठंच उणं आहे. त्याचा सगळा आत्मविश्वास टेक्नॉलॉजी आणि तिचा पालकांनी चालवलेले बेसुमार लाड यांच्या खांबावर उभा आहे. त्याला स्वत: मिळविलेल्या ज्ञानाचा आणि कर्तबगारीचा पाया नाही. अनेक मुलांचे पालक आयटी, कॉपोर्रेट किंवा मल्टिनॅशनल कंपन्यांतून भरपूर पैसा मिळवतात. मुलांना उच्च राहणीमान, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, भरपूर पॉकेटमनी आणि मनमुराद स्वातंत्र्य याचा लहानपणापासून लाभ मिळतो. पालक, कोचिंग क्लासेस, इंटरनेट यांच्यामुळे सारे काही हाताशी असतं. सारं काही सहज मिळत असल्यामुळे त्यांच्यात स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची कुवत नसते. संघर्ष, अनुभव आणि परिश्रम यांच्याविना मिळालेल्या सुख-सोयींमुळे या पिढीला योग्य वयातही स्वत:चे निर्णय स्वत:ला घेता येत नाहीत. अति जपल्यामुळेही अशी मुले व्यवहारज्ञानातही कच्ची राहतात.अलीकडे देशात वाढलेला दहशतवाद, खंडणीकरिता लहान मुलांचे अपहरण, लैंगिक शोषण व अत्याचार या विकृतीमुळे आजच्या लहान मुलांच्या आयुष्यावर भीतीचं सावट आहे. चार-पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि नंतर हत्या असेही भीषण प्रकार चालू आहेत. रेसिडेन्शियल स्कूलच्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांनाही लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागत आहे. मिळणाऱ्या सुबत्ता व स्वातंत्र्याला ग्रहण लागले आहे. दहा वर्षांच्या मुलामुलींनाही संध्याकाळी जाऊन खेळणं किंवा सोसायटीच्या आसपास मोकळी जागा असल्यास तिथे एकत्र जमणं, गप्पा मारणं यांसारख्या साध्या गोष्टीचा आनंद मिळणं दुरापास्त झाला आहे. संगणक, व्हिडीओ गेम्स, टीव्हीच्या आहारी गेलेल्या आणि सामाजिक जीवन हरवून बसलेल्या या पिढीला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान, सामाजिक जीवन यांना आजची पिढी पोरकी होत आहे. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत आहे.काही वर्षांपूर्वी घरातलं धान्य गिरणीतून दळून आणणं, किरकोळ किराणा, भाजी खरेदी ही कामं मुलंच करत असत. नातलगांना निरोप पोहचवण्याचं कामही १४-१५ वर्षांच्या मुलांवर सोपवलं जात असे. अशा कामातून मुलांना जीवनशिक्षण मिळत असे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच हे व्यवहारी ज्ञानही मुलांना संस्कारक्षम वयात मिळायला हवं. चैन, हौसमौज, ऐश-आराम हे सारे काही दिले आहे. पण, निसर्गाच्या सान्निध्यातील खेळापासून नवी पिढी वंचित आहे. त्यामुळे व्यक्तिगत विकासात त्यांना अडचण येते. असुरक्षिततेच्या छायेत ते वावरतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने घरात स्थानबद्ध होत असल्याने मुलं स्मार्ट होताहेत; पण स्वावलंबी नाही.