शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मामा रागावला; भाच्यांनी घर सोडून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:23 IST

पोलिसांनी तत्पर शोधमोहिम राबवित घेतला शोध

बारामती : अभ्यास करीत नसलेल्या भाच्यांवर मामा रागावला. मामाच्या रागावण्याचा भाच्यांना रागच आला. त्यातून बारामती शहरा लगतच्या गुणवडी(ता.बारामती)येथील चक्क पाच भाच्यांनी घर सोडले, शिवाय स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला. मात्र, शहर पोलीसांनी हा प्रकार गांभीर्याने मामावर रागावुन घर सोडलेल्या मुलांचा शोध घेण्यात यश आले.

गुणवडी गावातून चार मुली आणि एका मुलासह पाचजण सोमवारी(दि २२) सकाळी १०.०० वाजल्यापासून  गायब झाल्याची माहिती माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, तुषार चव्हाण, अक्षय सीताप, शाहू राणे यांना तातडीने तपास करण्याच्या सुचना दिल्या. ग्रामस्थांसह पोलीस पाटील यांच्या मदतीने पोलिसांनी चोहो बाजूने तपास सुरू केला. 

दरम्यान, मेखळी या ठिकाणी एका दुकानदाराने ती पाच भावंडे पाहिल्याचे सांगितले .ते वालचंद नगरचा रस्ता विचारत असल्याचे सांगितले. पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेत सायंकाळी ७ वाजता वालचंद नगर जंक्शन येथे दोन मुली प्रथम सापडल्या. या मुलींनी पोलीस नातेवाईक रागावण्याच्या भीतीने अपहरणाचा बनाव रचला. ओमनी गाडीत घालून त्यांना मामाकडे भेटायला घेऊन जातोय, असे सांगून गाडीत बसवले. त्यांना वालचंद नगरच्या दिशेने आणत त्यांना त्या ठिकाणी सोडल्याची हकीकत सांगितली. ही माहिती ऐकल्यानंतर पोलिसांच्या चिंतेत भर पडली.

पोलिसांनी शोध मोहीम आणखी तीव्र केली. काही वेळानंतर त्याच भागामध्ये आणखी दोन मुली मिळून आल्या.  त्या सर्व मुलांना विचारात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्या मुलांनी त्यांना कोणीही ओमनी गाडीतून अपहरण केलेले नाही ,तर त्यांचा मामा ही सर्व मुले अभ्यास करत नसल्याने रागवतो. त्यामुळे सर्वांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतल्याची कबुुली दिली. पोलीस आणि नातेवाईक रागावतील म्हणून त्यांनी या प्रकारचा बनाव केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांना उर्वरीत मुलगा देखील सापडला. सोमवारी रात्री साडेआठनंतर दोन बहिण भावंडांसह सख्ख्या तिघी बहिणींसह पाच जणांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. त्या सर्व बालकांच्या दोघी आई ह्या सख्या बहिणी आहेत. त्या दोघी सकाळी दवाखान्यात दहा वाजता बारामतीला आलेले असताना सर्व मुलांनी घरातून जाण्याचा निर्णय घेतला. सोबत कपडे व पिशवी घेत सर्वजण घराबाहेर पडले. नंतर ट्रकचालकाला विनंती करून वालचंद नगर जंक्शनला उतरले. पोलिसांनी शिताफीने तपास केल्याने सर्व मुलांचा वेळेत शोध लागला. अप्पर पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पुर्ण करण्यात आला.

टॅग्स :BaramatiबारामतीKidnappingअपहरणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक