शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मराठा आरक्षणाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 23:15 IST

मोर्चे शांततेत निघाले असले तरी त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचले असं फडणवीस म्हणाले

पुणे: मराठी आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली. मराठा समाजानं राज्यभरात लाखोंचे मोर्चे काढले. या मोर्चात कोणत्याही घोषणा दिल्या गेल्या नसल्या तरीही त्यांचा आवाज हजारोपटीनं मोठा होता, असं फडणवीस म्हणाले. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्थेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. 'मराठा समाजानं राज्याच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं आहे. या समाजातील मूठभर लोक आज श्रीमंत आहेत. मात्र उर्वरित समाज गरिब असून त्यांच्या विकासासाठी आरक्षण देण्यात यावं, यासाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांची सरकारनं दखल घेतली असून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे,' असं फडणवीस यांनी म्हटलं. या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीराजे, पालकमंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा मंत्री विजय शिवतरे, खासदार अनिल शिरोळे आणि महापौर मुक्ता टिळक हे मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा