शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

" मराठी " कधीच मरणार नाही : नोहा मस्सील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 13:17 IST

आजी-आजोबांच्या माध्यमातून मातृभाषा पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचविली जाईल. ते मराठी मरू देणार नाहीत

ठळक मुद्देनोहा मस्सील यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ‘भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार

पुणे : ’मराठी’ कधीच मरणार नाही. आजी-आजोबांच्या माध्यमातून मातृभाषा पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचविली जाईल. ते मराठी मरू देणार नाहीत असा विश्वास भारतीय बेने इस्त्राइल समाजाचे आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि साहित्यिक नोहा मस्सील यांनी व्यक्त केला.गेली चाळीस वर्षे इस्त्राइल मध्ये  ‘मायबोली’ मासिकाच्या माध्यमातून सातासमुद्रापार मराठीची पताका यशस्वीपणे फडकविणाऱ्या नोहा मस्सील यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ‘भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार देऊन  गौरविण्यात आले. त्यानिमित्त नोहा मस्सील यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. नोहा मस्सील यांनी भारतीय बेने इस्त्राइल समाजाचा इतिहास यावेळी कथन केला. ते म्हणाले, रोमन सरदाराने हल्ला करून जेरूसलेम जिंकले. ज्यूंची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली. त्यातून जीव वाचवून असंख्य ज्यू देश सोडून वाट फुटेल तिकडे पळाले. काहींना व्यापार आणि दयावर्दी पेशामुळे भारत माहिती असल्यामुळे छोट्या मोठ्या गलबतात बसून ते भारताच्या दिशेने निघाले. मात्र वादळवा-यात अनेक गलबते फुटली. जे सुदैवाने बचावले ते अलिबाग किनाऱ्याजवळ अलिबाग जवळच्या चौल (नौगाव) बंदराजवळच्या किनाऱ्याला लागले. दुर्दैवी सहप्रवाशांचे मृतदेह कोकणवासियांनी धार्मिक कर्तव्य म्हणून हिंदू पद्धतीने दहन केले. आजही नौगाव येथील समुद्र किना-यावर ही ज्यू लोकांची जुनी एकत्रित दफनभूमी आहे. हे आलेले ज्यू स्वत:ला बायबलमधील परंपरेप्रमाणे  ‘बेने इस्त्राइल’ म्हणवून घेऊ लागले. माझा जन्म आणि बालपण भारतातच गेले. वयाच्या 24 व्या वर्षी मी पितृभूमीच्या आंतरिक ओढीने इस्त्राइलला स्थलांतरित झालो. भारत सोडताना पाय निघत नव्हता. ‘नव्हतो आलो आक्रमक म्हणूनी, नव्हतो, आलो व्यापारी बनूनी युद्धात आपला देश गमावूनी ,आलो होतो आश्रित म्हणूनी, अशी भावना मनात रूंजी घालत होती. दोन्ही संस्कृती वेगळ्या असल्याने सुरूवातीला काहीसे अवघड गेले. भारतीय ज्यू म्हणून वेगळं राहायचो पण देशाच्या विविध भागातून ज्यू लोक प्रस्थापित झाल्यामुळे सर्वजण एकत्रितपणे मिसळून गेलो. हिब्रू भाषा सगळ्यांना यायला हवी असा इस्त्राइलचा नियम आहे. आम्ही हिब्रूभाषेत प्रार्थना करायचो पण अर्थ काळायचा नाही. त्यासाठी सहा महिने ट्रेनिंग घ्यावे लागले. कामचलाऊ भाषा म्हणून शिकलो. तिथे सणांच्या माध्यमातून लोकांना राष्ट्रवादाचे धडे दिले जातात. हा देश ज्यूंच्या हातात असला तरी इस्त्राइल अरबांनाही सामावून घेतले आहे. देशाची लोकसंख्या अधिकाधिक वाढावी यासाठी कुटुंबातील प्रत्येक मुलाला सरकारकडून 18 वर्षांपर्यंत दीड हजार शेकल दिले जातात असे त्यांनी सांगितले. इस्त्राइलमध्ये सुमारे 30 हजार मराठी ज्यू आहेत. आम्ही महाराष्ट्र दिन तिथे मोठ्या उत्साहात साजरा करतो. ’ मायबोली’ या मासिकाच्या माध्यमातून मराठी भाषा आम्ही जिवंत ठेवली आहे. आमच्या पुढच्या पिढीला मराठीचा गंध नसला तरी आम्ही भारत आणि मराठीचे प्रेम जपले आहे. मराठी कधीच मरणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ............मोदींमुळे भारत-इस्त्राइल संबंध अधिक दृढ झालेपूर्वी पंडित नेहरूंचे इस्त्राइलबाबत धोरण तटस्थ असायचे. दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध फारसे चांगले नव्हते. 1992 नंतर भारत ईस्त्राईलचे संबंध अधिकृतपणे प्रस्थापित झाले. वाजपेयी सरकारच्या काळात भारत आणि ईस्त्राईलचे संबंध सुधारण्यास सुरूवात झाली. मोदी सत्तेत आल्यानंतर हे संबंध अधिकच दृढ झाले. पूर्वी भारत गरीब देश वाटायचा पण आता सन्मान मिळत असल्याची भावना नोहा मस्सील यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदmarathiमराठीIsraelइस्रायल