शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
3
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
4
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
5
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
6
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
7
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
8
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
9
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
10
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
11
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
12
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
13
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
14
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
15
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
16
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
17
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
18
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
19
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
20
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मार्क कमी पडले, आईबाबा ओरडले, काय करू?

By admin | Published: June 01, 2017 2:37 AM

दहावीमध्ये खूप छान मार्क पडले; पण बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले... आईबाबांच्या खूप अपेक्षा होत्या... ते खूप ओरडले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दहावीमध्ये खूप छान मार्क पडले; पण बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले... आईबाबांच्या खूप अपेक्षा होत्या... ते खूप ओरडले काय करू? परीक्षेत कमी गुण मिळालेली आणि नापास झालेली मुले आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होती. निकालाच्या दिवशी इतर कुणी नसले तरी किमान पालकांनी मुलांना समजून घेणे गरजेचे असते; पण मंगळवारी हेल्पलाइनचे कर्मचारीच त्यांचे ‘पालक’ बनले होते... मनातले विचार व्यक्त करण्यासाठी राज्यातील अनेक मुला-मुलींनी हेल्पलाइनचा आधार घेतला. परीक्षेचा निकाल म्हणजे जणू विद्यार्थ्यांसाठी सत्त्वपरीक्षाच असते... परीक्षेत कमी गुण मिळाले अथवा नापास झाले तर मुले आयुष्य संपविण्यापर्यंत पावले उचलतात, नैराश्य दूर करून त्यांना आधार देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी पालकांचीच असते. मात्र त्यांच्या दबावामुळे मुलांमध्ये नैराश्य येते, त्यांचे कुणीतरी ऐकावे, अशी त्यांची अपेक्षा असते. मन मोकळे करायचे असते. यासाठी ही मुले हेल्पलाइनचा आधार घेतात, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आयुष्यात खूप संधी मिळतील अशा माध्यमातून त्यांचे समुपदेशन केले जाते, मंगळवारी दिवसभरात २ ते ८ या वेळेत सुमारे २0 ते २५ मुलांनी संपर्क साधला असल्याची माहिती कनेक्टिंग स्वयंसेवी संस्थेचे वीरेन रजपूत यांनी दिली. हेल्पलाइन क्रमांक : अनिल गुंजाळ ९४०४२३५१४५, विरेन कनेक्टिंग एनजीओ १८००२०९४३५३एका माणसाचा फोन आला आणि तू नापास झाला आहेस, पास करायचे असेल तर १३ हजार रुपये भर, असे कुणीतरी एका नाशिकच्या मुलाला सांगितले. खरेच असे असते का? असा भाबडा प्रश्न त्या मुलाने केला... तर दहावीमध्ये ९१ टक्के पडले होते आणि आता बारावीत ५0 टक्के पडले असा एकजण सांगत होता... वाशिम, यवतमाळपासून अनेक भागांमधील मुला-मुलींनी फोन करून आपली भावना व्यक्त केली. नापास झालात किंवा कमी गुण पडले तरी निराश होण्याची आवश्यकता नाही, हीच नवी संधी आहे असे समजा अशा माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करीत असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सहसचिव व समुपदेशक अनिल गुंजाळ यांनी सांगितले.