शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

अनेक शहरातील कमाल तापमान चाळीशी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात अवकाळी पावसाचे सावट दूर झाल्यानंतर हवामान कोरडे झाल्याने तापमानात मोठी वाढ झाली असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात अवकाळी पावसाचे सावट दूर झाल्यानंतर हवामान कोरडे झाल्याने तापमानात मोठी वाढ झाली असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणचे कमाल तापमानाने चाळीशी पार केली आहे. राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक कमाल तापमान ४१.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. सांताक्रुझ येथील कमाल तापमानही ४०.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते सरासरीच्या तुलनेत ७.७ अंश सेल्सिअसने अधिक आहे.

कोकण, गोव्याच्या तुरळक भागात उष्णतेची तीव्र लाट होती. काही भागात कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकणातील काही भागात तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून कमाल व किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३८.१/१७.३, लोहगाव ३८.८/१९.८, जळगाव ४०.४/१५, कोल्हापूर ३८.२/२३.७, महाबळेश्वर ३२.१/१९, मालेगाव ३९.८/१७.४, नाशिक ३८.२/१६, सातारा ३८/२०.४, सोलापूर ४०.४/२२.६, मुंबई ३८/२५, सांताक्रुझ ४०.९/२२.२, रत्नागिरी ३६/२४.४, पणजी ३५/२७.२, डहाणु ३४.५/ २३.१, औरंगाबाद ३८.२/१९, परभणी ३९.५/२०.४, अकोला ४०.४/१७.५, बुलढाणा ३७.८/२०, चंद्रपूर ४१.२/२१, गोंदिया ३७.६/१९.२, नागपूर ३९/१८.३, वर्धा ३९.४/१९.९.