शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

आव्हानांना सामोरे जा....'' लोकमत वुमेन समीट २०१९ '' परिसंवादातील सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 11:30 IST

आज महिला आपणहून पुढे येत सारथ्याची भूमिका पार पाडत आहेत...

ठळक मुद्दे  ‘अग्निपंख’ या विषयावर आधारित परिसंवादात त्यांनी महिलांना मार्गदर्शनस्वाती मुजुमदार आणि रूपाली देशमुख यांनी दिला महिलांना यशस्वितेचा मूलमंत्र

पुणे : स्त्री-पुरूष भेद ही केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील समस्या आहे. आज असं कोणतेही क्षेत्र नाही जिथं महिला स्वत:ला सिद्ध करू शकत नाहीत. त्यामुळं आपलं शिक्षण थांबवू नका आणि आव्हानांना सामोर जा....लक्षात घ्या एक दिवस यश तुमच्या हातात आहे.....अशा शब्दांत ‘लिव्ह टू लीड’ संकल्पनेवर आधारित ‘ लोकमत वुमेन समीट २०१९ ’’ परिषदेत सिंबायोसिसच्या संचालक डॉ. स्वाती मुजुमदार आणि जल व शाश्वत विकास तज्ञ (स्वीडन) रूपाली देशमुख यांनी महिलांना यशस्वीततेचा मूलमंत्र दिला. आनंदीबाई जोशी यांनी शिक्षणाचे ’अग्निपंख’ घेऊन देशातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला. आज महिला आपणहून पुढे येत सारथ्याची भूमिका पार पाडत आहेत. डॉ. स्वाती मुजुमदार आणि रूपाली देशमुख ही दोन त्याची प्रातिनिधिक उदाहरण आहेत. डॉ. स्वाती मुजुमदार यांनी अनेक वर्षे कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांमध्ये संशोधन करून भारतात  ‘कौशल्य विद्यापीठ’ विकसित करण्याच्या दृष्टीने मॉडेल विकसित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिली सिंबायोसिस कौशल्य आणि अभिमत विद्यापीठ’ सुरू करण्यात आले. तर रूपाली देशमुख यांनी जल आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परिषदेअंतर्गत झालेल्या  ‘अग्निपंख’ या विषयावर आधारित परिसंवादात त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देऊन उपयोग नाही तर त्यांच्यात कौशल्य विकसित करून स्वत:च्या पायावर उभं करण्याची खरी गरज आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती होण्याची आवश्यकता आहे. ज्या महिला बिकट परिस्थितीमुळे  दहावीपर्यंत देखील शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना शिक्षण दिले गेले पाहिजे. यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल झाला पाहिजे. रूपाली देशमुख म्हणाल्या, आज जगभरामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पाणी प्रश्न हा मुख्यत: महिलांशी निगडित आहे. त्यामुळे भारतात पाण्यासंबंधी कोणतही धोरण राबविताना त्यात महिलांचा सहभाग असणं आवश्यक आहे. त्यांचे मत विचारात घेतलं पाहिजे. आपल्याकडे जल आणि शाश्वत विकासाबाबत जनजागरूकता नाही. पाण्याचा किती वापर होतो त्याचा अभ्यास झाला पाहिजे.

परिसंवादाचे सूत्रसंचालन लीना सरढाणा-जोशी यांनी केले.

टॅग्स :Lokmat Women Summitलोकमत वुमेन समीटPuneपुणेLokmat Eventलोकमत इव्हेंटWomenमहिला