शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

दिल्लीत झालेली बैठक पर्याय निर्माण करण्यासाठी नव्हती; सामुदायिक नेतृत्व हवे- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 07:58 IST

शरद पवार, सामुदायिक नेतृत्व हवे; परंतु काँग्रेसला वगळून नको

पुणे : नवी दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत गैरसमज पसरविले जात असून पर्याय निर्माण करण्यासाठी ती आयोजित केली नव्हती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. देशाचे राज्यकर्ते विरोधी भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात ईडी, सीबीआयचा वापर करत आहेत जे आजपर्यंत कधी झाले नव्हते, असेही पवार म्हणाले.

पक्षाच्या पुण्यातील नव्या कार्यालयाची पवारांनी सायंकाळी पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, “दिल्लीत झालेली बैठक पर्याय निर्माण करण्याच्या विचाराने नव्हतीच. तिथे सहा महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांनी कटाक्षाने राजकीय पक्षांना दूर ठेवले आहे; पण इतके महिने सुरू असलेल्या प्रश्नावर संसदेत विषय कसा मांडता येईल, त्यावर काय करता येईल यासाठी त्या बैठकीत चर्चा झाली.” 

“केंद्रातील भाजपला पर्याय नक्कीच निर्माण झाला पाहिजे; पण तो काँग्रेसला वगळून नको अशी माझी भूमिका आहे. ती जाहीरपणे मांडली आहे. मात्र, या पर्यायाचे नेतृत्व सामुदायिक हवे,” असे मत पवार यांनी स्पष्ट केले. काश्मीरविषयी पंतप्रधान जे काही म्हणाले ते चांगले आहे; पण काश्मीरला स्वतंत्र दर्जा होता, तो काढून घेऊ नका, असे त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो. ते त्यांनी ऐकले नाही. आता बहुधा त्यांना त्यांची चूक समजली असेल तर तेही चांगलेच आहे. फक्त आता त्यांनी बदलू नये, असे पवार म्हणाले.

‘नवा उद्योग’ सल्लागाराचा!

देशात पर्याय उभा राहिलाच पाहिजे. तो काँग्रेसला बरोबर घेऊनच; पण त्याचे नेतृत्व सामुदायिक हवे, यावर ‘सामुदायिक नेतृत्व म्हणजे शरद पवार का,’ असा प्रश्न विचारला असता मिश्कीलपणे हसत पवार उत्तरले, “असे बरेच उद्योग आतापर्यंत केले आहेत.माझी भूमिका आता मार्गदर्शकाची, सल्ला, दिशा देण्याची राहील.”

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र