शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आठवणी पानशेत पुराच्या ! तो भयंकर दिवस आणि उध्वस्त शहर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:26 IST

पानशेत धरण फुटून झालेल्या अपरिमित हानीला आज ६७वर्षे उलटली आहेत. पण अजूनही तो भयंकर दिवस आणि त्या काळरात्रीच्या आठवणी अनेक पुणेकरांच्या अंगावर काटा आणतात.

पुणे : पानशेत धरण फुटून झालेल्या अपरिमित हानीला आज ६७वर्षे उलटली आहेत. पण अजूनही तो भयंकर दिवस आणि त्या काळरात्रीच्या आठवणी अनेक पुणेकरांच्या अंगावर काटा आणतात.१२ जुलै, १९६१ला सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते.आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण शहरात होता तो अंधार, चिखल आणि उध्वस्त झालेल्या संसाराचे उरलेले अवशेष.या प्रलयातून पुणेकर सावरले पण त्याच्या आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत. 

        निर्मला केळकर म्हणाल्या की, मी १२ तारखेला पुण्यात नव्हते पण १४ तारखेला आले तेव्हा मात्र धक्का बसला.जे शहर आम्ही बघितले होते त्याचा लवलेशही शिल्लक नव्हता.आम्ही डेक्कन जिमखान्यावर माडीवर राहत होतो. त्यामुळे अनेक कुटूंबांनी आमच्या घरात आसरा घेतला होता.बाहेर तर फक्त चिखल आणि पाणीच दिसत होतं. जवळपास सात ते आठ दिवस आमच्याकडे अनेक जण राहायला होते.

       आनंद सराफ म्हणाले की, पूर आला तेव्हा आम्ही लहान होतो. ही बातमी समजल्यावर माझे आजोबा तातडीने पुण्याला आले. मंडईतल्या आमच्या घरच्या घरी सर्व नातवंडांना घेऊन त्यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिलेली आठवण अजूनही आठवतेय. पुण्याचा चेहरामोहरा या घटनेने बदलून गेला होता. पूर्वी शहराबाहेर असणारी पर्वती शहराच्या केंद्रस्थानी आली.

  शशीधर भावे म्हणाले की, त्याकाळी लकडी पुलाला पाणी येणे यात काही नावीन्य नव्हते. पण त्या दिवशी छातीपर्यंत पाणी वाढले आणि हे काहीतरी वेगळे असल्याचे जाणीव आम्हाला झाली.बघता बघता आमचे दुमजली घर या पुरात कोसळले.आमच्या लॉन्ड्रीच्या मशीन तर ओंकारेश्वरपासून वाहत वाहत काँग्रेस भवनपर्यंत गेल्या होत्या. ते सारे रुळावर येईपर्यंत मोठा कालावधी गेला पण आज इतक्या वर्षांनंतरही तो दिवस विसरणे कठीण आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊस