शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
5
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
6
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
7
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
9
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
10
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
11
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
12
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
13
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
14
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
15
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
16
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
17
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
18
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
19
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
20
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न

‘ठंडा होने दो’ची पद्धत; पुण्यात भाजपची बंडखोरी संपली, काँग्रेसची सुरूच, फटका आघाडीला बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 13:12 IST

भाजपने अवघ्या तासाभरातच बंडखोरी संपवली, काँग्रेसचे मात्र बंडखोरीकडे लक्षच नाही

पुणे : भारतीय जनता पक्षाची विधानसभेसाठी पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघात होत असलेली बंडखोरी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने अवघ्या तासाभरात संपवली, काँग्रेसचा घोळ मात्र अजूनही सुरूच आहे. ‘ठंडा होने दो’ ही पक्षाची पारंपरिक पद्धत अवलंबण्यात येत असून, ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीच चित्र स्पष्ट होईल.

महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तीन तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (उद्धव ठाकरे) असे प्रमुख ६ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यातील जागा वाटप निश्चित होत नव्हते, त्यामुळेच अनेकांनी निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली होती. त्यातही भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून जास्त जण इच्छुक होते. जागावाटप निश्चित झाल्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी उचल खाल्ली व बंडखोरी जाहीर केली.

भाजपमध्ये कोथरूडमधून अमोल बालवडकर, उज्ज्वल केसकर, पर्वतीमधून श्रीनाथ भिमाले, शिवाजीनगमधून मधुकर मुसळे, कॅन्टोन्मेटमधून भरत वैरागे अशा अनेकांनी पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतरही लढणार असे जाहीर केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीच केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ व अन्य वरिष्ठ नेत्यांनी भिमाले, बालवडकर यांच्याबरोबर संपर्क साधला. त्यांनी लगेचच माघार घेत असल्याचे जाहीर केले. केसकर यांच्याबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संभाषण केले व त्यांनीही माघार घेत असल्याचे सांगितले. आता मुसळे व वैरागे यांच्यापैकी वैरागे यांनी अर्ज दाखल केला आहे, मात्र हा अर्जही मागे घेतला जाईल, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

अवघ्या एका तासात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी शमवली. दुसरीकडे काँग्रेस मात्र बंडखोरी होऊनही तिकडे लक्ष द्यायला तयार नाही. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी कसबा विधानसभेतून पक्षाच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघात पक्षाचे पदाधिकारी मुख्तार शेख यांनीही बंडखोरी केली आहे. पर्वतीत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज सादर केला आहे. शिवाजीनगरमध्ये मनीष आनंद यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोर अर्ज सादर करून आव्हान उभे केले आहे. तीन ठिकाणी अशी बंडखोरी होऊनही पक्षाचे स्थानिक, वरिष्ठ पदाधिकारीही शांतच आहेत. बंडखोरांबरोबर बोलणे, त्यांना समजावणे यापैकी काहीही झालेले नाही. ठंडा होने दो, ही काँग्रेसची दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतची खास पद्धत आहे. तीच पुण्यातही अवलंबण्यात येत आहे, अशी चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये यावरून होत आहे.

निवडणूक आहे, प्रत्येकाला ती लढवण्याची इच्छा असतेच. ज्यांनी पक्षाच्या मान्यतेशिवाय अर्ज दाखल केले आहेत, त्यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. तेही पक्षाच्या या पदाधिकाऱ्यांबरोबर बोलतील. त्यानंतर ते अर्ज मागे घेतील याची खात्री आहे. - अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसkasba-peth-acकसबा पेठparvati-acपर्वतीshivajinagar-acशिवाजीनगर