शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

महापालिका प्रशासकासमोर मंत्रीही हतबल; प्रकल्प आढावा बैठक,कामाचा वेग वाढवण्याची दिली तंबी

By राजू इनामदार | Updated: January 4, 2025 17:45 IST

तशी कबुलीच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्य सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पुणे : महापालिकेत २ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या प्रशासक राजमुळे पुणेकर तर हैराण झाले आहेतच, आता केंद्र व राज्य सरकारचे प्रतिनिधी असलेले मंत्रीही हतबल झाले आहेत. तशी कबुलीच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्य सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने हे माजी नगरसेवक असलेले विद्यमान आमदारही यावेळी उपस्थित होते.शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. अतिक्रमणांनी शहरातील बहुसंख्य प्रमुख रस्ते खाल्ले आहेत. केंद्र व राज्य सरकारची मदत असलेले नदी सुधार, समान पाणीपुरवठा असे कितीतरी प्रकल्प काही वर्षे रखडले आहेत. वाहतुकीची कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, नव्या बांधकामांमुळे होत असलेले प्रदूषण या त्रासाने पुणेकर हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासन यावर काहीही उपाययोजना करायला तयार नाही.स्थानिक नगरसेवकच नसल्याने नागरिकांना तक्रारींसाठी केवळ प्रशासन आहे व प्रशासन त्यांना विचारायलाही तयार नाही. त्यामुळेच या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ व राज्य सरकारचे मंत्री पाटील यांनी महापालिकेत शनिवारी प्रकल्प आढावा बैठक आयोजित केली होती. त्याला उपस्थित राहण्यास पत्रकारांना मज्जाव करण्यात आला.मात्र, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आदी उपस्थित होते. अधिकारी, आमदार व दोन मंत्री यांची बैठक तासभर चालली. मंत्री द्वयांनी पत्रकार परिषदेत विकासकामांना अपेक्षित गती नसल्याचे सांगितले. सरकारकडून काही अपेक्षा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकांमध्ये आचारसंहितांमुळे प्रशासनाला काही सांगण्यासाठी मर्यादा होत्या असे म्हणत पाटील यांनी एक प्रकारे प्रशासनाची पाठराखणच केली.काही महिन्यांपूर्वी तुम्हीच बैठक घेतली. त्यातही प्रशासनाला आदेश दिले त्याचे काय झाले? शहरातील अतिक्रमणे आहेत तशीच आहेत. उलट आता नाल्यांमध्ये स्वच्छ केलेल्या जागांवर पक्के बांधकाम होत आहे. रस्त्यांवरील खड्डे कमी होण्याऐवजी वाढलेच आहेत. समान पाणीपुरवठा, नदी सुधार व शुद्धीकरण असे अनेक प्रकल्प रखडले आहेत. याकडे पत्रकारांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. मोहोळ यांनी नंतर कोणत्या प्रकल्पाची काय कामे झाली याची माहिती दिली. अतिक्रमणे काढण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले आहेत. यापुढे त्यांच्याकडून कारवाई झाली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बैठकीत दिला असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाMLAआमदारcivic issueनागरी समस्याchandrakant patilचंद्रकांत पाटीलmurlidhar moholमुरलीधर मोहोळ