शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

साहित्य संमेलन स्पेशल ट्रेन तिकीटाचा तिप्पट दर..! मनसेकडून मोफत प्रवासाची मागणी

By राजू इनामदार | Updated: January 25, 2025 17:41 IST

मोफत रेल्वे सोडण्याची मागणी: मुख्यमंत्री, पुण्यातील मंत्ऱ्यांवर टीका

पुणे: दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तीनपट दर आकारून रेल्वेगाडी सोडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर टीका केली असून रेल्वे मंत्रालयाने मराठी साहित्य रसिकांसाठी मोफत रेल्वे सोडावी अशी मागणी रेल्वे विभागाकडे केली आहे. याची दखल घेतली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

सरहद संस्था दिल्लीतील संमेलनाची संयोजक आहे. संमेलन परराज्यात असेल तर सर्वसाधारणपणे रेल्वेकडून सवलतीच्या दरात जादा गाडीची व्यवस्था केली जाते. मात्र यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना यासंबधीची व्यवस्था पाहणाऱ्यांना, रेल्वे आता विनामुल्य गाडी देत नाही, उलट जादा गाडी आरक्षित केली तर त्यासाठी तीनपट दर द्यावा लागतो असे सांगून त्याचपद्धतीने गाडी दिली आहे. यालाच मनसेने आक्षेप घेतला आहे. यापुर्वी घुमान संमेलनासाठी रेल्वेने विनामुल्य जादा गाडी उपलब्ध करून दिली होती. अयोध्या दर्शनसाठीही सवलतीच्या दरात जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठीही रेल्वेने विशेष व्यवस्था करून जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. असे असताना केंद्र सरकारने ज्या भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा दिली त्याच भाषेच्या गौरवासाठी मागील ९७ वर्षे होत असलेल्या अखिल भारतीय संमेलनासाठी गाडी सोडली जात नाही म्हणजे काय? असा प्रश्न मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी रेल्वे उपविभागीय कार्यालयाला दिलेल्या पत्रात केला आहे.

हा मराठी भाषेची उपेक्षाच नाही तर अवमान करण्याचा प्रकार असल्याचे संभूस यांनी म्हटले आहे. वास्तविक राज्याच्या मुख्यमंत्ऱ्यांनी याबाबतीत तातडीने रेल्वे मंत्ऱ्यांबरोबर बोलायला हवे होते. आयोजक संस्था पुण्याची आहे. ती आर्थिक देणग्यांमधूनच संमेलन करणार आहे. संमेलनाला जाऊ इच्छिणारे मराठी साहित्यिक व साहित्यरसिकही फार काही धनवान नसतात. हे लक्षात घेऊन पुणेकर असलेले केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी, राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ या मंत्ऱ्यांनीही त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, मुख्यमंत्ऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून द्यायला हवी असे मत संभूस यांनी व्यक्त केले. मनसे मराठी भाषेची ही उपेक्षा सहन करणार नाही. रेल्वे मंत्रालयाने याची दखल घ्यावी, एक १८ डब्यांची जादा गाडी खास साहित्य संमेलनासाठी म्हणून सोडावी, अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनrailwayरेल्वेRaj Thackerayराज ठाकरे