शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

माेदींनी पुण्यातील समाजवाद्यांबाबत सांगितलेला किस्सा बनावट ; समाजवाद्यांची माेदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 18:53 IST

माेदींनी समाजवाद्यांवर केलेल्या टीकेवर माेदींनी मुलाखतीत सांगितलेला किस्सा हा बनावट वाटत असून माेदींना समाजवादी चळवळीची टिंगल करायची हाेती अशी प्रतिक्रिया समाजवादी विचारवंतांनी लाेकमतकडे व्यक्त केली.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखात घेतली. त्यात माेदींनी पुण्याचा एक किस्सा सांगत पुण्यातील समावाद्यांवर टीका केली हाेती. पुण्यातील समाजवादी लोक स्वत:ला साधं, गरीब आणि सरळमार्गी दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचं मोदींनी म्हटल हाेते. त्याला पुण्यातील समाजवादी विचारवंतांनी उत्तर दिले आहे. माेदींनी मुलाखतीत सांगितलेला किस्सा हा बनावट वाटत असून माेदींना समाजवादी चळवळीची टिंगल करायची हाेती अशी प्रतिक्रिया या विचारवंतांनी लाेकमतकडे व्यक्त केली. 

मी जे सांगत आहे ते कुणाचीही टिंगल किंवा टीका-टिपण्णी करण्याचा उद्देश नाही. पण, माझ्या जीवनात घडलेला हा प्रसंग असून खूप जुनी आठवण आहे ही. मी तेव्हा हाफ कुर्ता, पायजमा, पायात बूट, खांद्यावर पिशवी आणि चेहऱ्यावर दाढी अशा पोषाखात फिरत असे. एकदा मी पुण्यातील रेल्वे स्थानकावर उतरलो. हातात एक वर्तमानपत्र आणि खांद्यावर पिशवी अकडवून मी पुण्यातील आरएसएसच्या शाखेकडे निघालो होतो. मी चालतच निघालो होतो, तेव्हा एक रिक्षावाला माझ्यासोबत हळुहळू रिक्षा चालवत होता. मी 100 ते 200 मीटर पुढे चालत आलो, तरीही रिक्षावाला माझ्यासोबतच. त्यामुळे मी त्याला विचारला, भाई आपकी ऑटो मे कुछ प्रॉब्लम है क्या..? त्यावर तो म्हणाला तुम्ही रिक्षात नाही का बसणार ? मी उत्तरलो.. नाही मी तर चालत चाललो आहे. त्यांतर रिक्षावाल्यानं विचारलं, तुम्ही समजवादी आहात का ?. तर, मी म्हटलं नाही, मी अहमदाबादी आहे. पण, तुम्ही मला समाजवादी असं का विचारलं ?. त्यावर, रिक्षावाला म्हणाला पुण्यातील समाजवादी लोकं सर्वसामान्य लोकांसमोर रिक्षात बसत नाहीत. तर पुढे गेल्यानंतर गपचूप रिक्षात बसतात. असा किस्सा माेदी यांनी मुलाखतीत सांगितला हाेता. 

याबाबत लाेकमतने पुण्यातील समाजवादी विचारवंतांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ज्येष्ठ समाजवादी नेते डाॅ. कुमार सप्तर्षी म्हणाले, माेदींनी सांगितलेला किस्सा हा बनावट वाटताे. माेदींना समाजवादी चळवळीची टिंगल करायची हाेती. अक्षय कुमार यांनी माेदींची घेतलेली मुलाखत ही पाेरकट हाेती. माेदी हे मला संभ्रमित व्यक्ती वाटतात. माेदी हे पंतप्रधान या पदाला शाेभत नाहीत. माेदींनी मुलाखतीत पुण्यातील समाजवाद्यांबाबत सांगितलेला किस्सा हा खाेटा वाटताे. आधीच्या काळी काही तथाकथित पुणेकर हे थाेड्या पुढे जाऊन रिक्षा घेतल्यास पैसे कमी पडतील म्हणून स्टेशनपासून काही अंतर चालत जाऊन रिक्षा घेत असत. त्यात रिक्षाचे भाडे कमी लागावे असे त्यांना वाटत असे. असाच काहीसा किस्सा त्यांना प्रकाश जावडेकर किंवा गिरीश बापट यांनी सांगितला असेल. त्यात माेदींनी ताेडफाेड करुन समाजवाद्यांचा किस्सा म्हणून सांगितला आहे. प्रत्यक्षात त्याकाळी रिक्षा हे सर्वसामान्य पुणेकरांचे वाहन नव्हते. रिक्षा हे पांढरपेशी नागरिकांचे वाहन हाेते. त्यामुळे असा कुठला किस्सा घडला असेल असे वाटत नाही. तसेच यामुळे समाजवाद्यांचा किंवा पुणेकरांचा कुठला अपमान हाेताेय असे मला वाटत नाही.

सुभाष वारे म्हणाले, माेदींनी अक्षय कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत पुण्याचा जाे किस्सा सांगितला ताे मला स्वरचित वाटताे. रिक्षावाला समाजवाद्यांबाबत असे काही बाेलेल असे वाटत नाही. आत्ताच्या लखनाै आणि पटणातील काही समाजवाद्यांबाबत एखादा रिक्षावाला असे म्हंटला असता तर गाेष्ट वेगळी हाेती. परंतु महाराष्ट्रातले समाजवादी हे साधे राहणारे तसेच समाजासाठी कष्ट करणारेच आहेत. महाराष्ट्रात अनेक थाेर समाजवादी हाेऊन गेले आहेत. एस. एम. जाेशी, नारासाहेब गाेरे, ग.प्र. प्रधानांच्या, डाॅ. बाबुसाहेब काळदाते यांची थाेर परंपरा असलेल्या समादवाद्यांबाबत एखादा रिक्षावाला असे काही बाेलेल असे वाटत नाही. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी जी प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत, त्यांचा माेदींनी एकदा अभ्यास करावा. ते ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्याच्याशी ते कुठे मेळ खातं यावर देखील त्यांनी कधीतरी भाष्य करावं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKumar Saptarshiकुमार सप्तर्षीAkshay Kumarअक्षय कुमारPuneपुणे