शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

Maharashtra | महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाची शेतकऱ्यांना हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 13:24 IST

भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट...

नितीन चौधरी

पुणे : यंदाचा उन्हाळा गेल्या १२२ वर्षांतील सर्वाधिक उष्ण तर ठरलाच मात्र, त्याचा परिणाम अवकाळी पावसावरही झाला. राज्यात मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांच्या काळात तब्बल ११ जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा एकही थेंब पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी पूर्वमशागतीची तयारी करणारे शेतकरी मात्र, हवालदिल झाले आहेत. गेल्या काही वर्षांत असे पहिल्यांदाच होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.

मार्च ते मे हा काळ म्हणजे अवकाळी पावसाचा काळ. यामुळे शेतातील उभ्या पिकांना फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते. मात्र, मे महिन्यात येणाऱ्या पावसाचा फायदा काही प्रमाणात खरीप पिकांच्या पूर्वमशागतीसाठी होतो. यंदा मात्र, राज्यात तसेच देशातही वेगळी परिस्थिती दिसून आली आहे. राज्यातील तब्बल ११ जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झालाच नाही. त्यात ठाणे, नंदूरबार, जालना, बीड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर व वर्धा या विदर्भातील, तर लातूर, परभणी, नांदेड या मराठवाड्यातील व रायगड जिल्ह्यांत अवकाळी पावसात सुमारे ९३ ते ९६ टक्क्यांची घट झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील घट ही ७६ टक्के आहे. पालघर व नाशिकमध्ये ८५, नगरमध्ये ८३, साताऱ्यात ६८ व गडचिरोलीत ६३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांची मोठी घट (६० ते ९९ टक्क्यांची घट) अशी वर्गवारी केली आहे. तर घट असलेल्या जिल्ह्यांत जळगाव (३०), धुळे (२४), औरंगाबाद (५८), सोलापूर (२६) व उस्मानाबाद (४०) यांचा समावेश आहे. तसेच सामान्य पाऊस झालेल्या (अधिक १९ ते उणे १९ टक्के) जिल्ह्यांमध्ये सांगली (उणे १९), रत्नागिरी (उणे ११) व सिंधुदुर्ग (अधिक १६) यांचा समावेश आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्यात ६६ टक्के जादा पाऊस झाला आहे.

देशातील ९ टक्के म्हणजेच तब्बल ६६ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झालेला नाही. त्यात गुजरातमधील २५, उत्तर प्रदेशातील १४ व महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, “यंदाचा उन्हाळा गेल्या १२२ वर्षांनंतरचा सर्वात उष्ण ठरला. त्यामुळे वातावरणात आर्द्रता शिल्लकच नव्हती. पश्चिमी वारेसुद्धा अतिशय कोरडे वाहत होते. भूपृष्ठीय तापमानही सुमारे ६० अंशांपर्यंत पोचले होते. याच काळात अवकाळी पावसासाठी अनुकूल स्थिती नव्हती. या अवकाळी पावसाचा शेतीला फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होतो. तर मे महिन्यात होणाऱ्या अवकाळी किंवा मान्सूनपूर्व पावसामुळे कोकणातील भाताच्या रोपांना किंवा उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील पूर्वहंगामी कापूस लागवडीला फायदा होतो. तो अगदीच थोडा असतो.”

गेल्या मेमध्ये चांगला पाऊस

कृषी विभागाच्या पावसाच्या आकडेवारीवरूनही हे स्पष्ट होत आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये ७.७ मिलिमीटर पाऊस झाला होता, तर यंदा तो केवळ २.८ मिमी. झाला आहे. एप्रिल २०२१मध्ये १०.२, तर यंदाच्या एप्रिलमध्ये ८.८ मिमी. तसेच मे २०२१मध्ये अवकाळीचे प्रमाण ५९.५ मिमी. होते. यंदा मात्र ते १३.४ मिमी.इतकेच आहे. यावरून अवकाळी पाऊस कमी झाल्याचे दिसून येत आहे.

खरिपाची पूर्व मशागत करण्यासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फायदा होतो. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन नांगरणी किंवा वखरणी करणे सोपे होते. यंदा मात्र, विदर्भात अवकाळी पाऊस झाला नाही.

- संजय गाढे, वरिष्ठ व्यवस्थापक, अजित सीड्स, अकोला

यंदा अवकाळी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याचा फारसा फायदा होत नसला तरी पूर्वमशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे.

- दिलीप झेंडे, कृषी संचालक, बियाणे व निविष्ठा

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रMonsoon Specialमानसून स्पेशल