शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

Monsoon Update | पावसाळा सुरू होऊन झाला महिना; पण बाराच दिवस पडला पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:49 IST

मृग नक्षत्र समाप्तीनंतरही खरीप हंगामातील पेरणीची कामे प्रतीक्षेत....

-भानुदास पऱ्हाड

शेलपिंपळगाव : पावसाळी हंगाम सुरू होऊन तब्बल एक महिना होत आला आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जिल्ह्यात १ जून ते २७ जूनपर्यंत ४३.३ टक्के पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत सरासरी फक्त १२ दिवसच अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परिणामी अनेक तालुक्यात मृग नक्षत्र समाप्तीनंतरही खरीप हंगामातील पेरणीची कामे प्रतीक्षेत आहेत.

चालू वर्षी वरुणराजाचे अर्थातच मान्सूनचे दहा दिवस अगोदर आगमन होणार असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र मान्सूनच्या प्रवासाला अनुकूल वातावरण न लाभल्याने पावसात खंड पडला आहे. सद्यस्थितीतही मान्सूनची प्रतीक्षा करावी लागत आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल घडून आल्याने जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा होत आहे. त्यामुळे मान्सूनचे वेध सर्वांना लागले आहेत.

जिल्ह्यात हवेली तालुक्यात ३१.६ टक्के पाऊस झाला असून अवघे पाचच दिवस अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुळशी तालुक्यात १२.८ टक्के पाऊस झाला असून पाचच दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. भोर तालुक्यात २८.७ टक्के पाऊस झाला असून आठ दिवस अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मावळ तालुक्यात २१.७ टक्के पाऊस झाला असून सात दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. वेल्हा तालुक्यात २२.९ टक्के पाऊस झाला असून सात दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जुन्नर तालुक्यात १०७.६ टक्के पावसाची नोंद झाली असून अकरा दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

खेड तालुक्यात ५१.५ टक्के पावसाची नोंद असून आठ दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. आंबेगाव तालुक्यात ७७.१० टक्के पावसाची नोंद असून दहा दिवस अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. शिरूर तालुक्यात ८५.६ टक्के पावसाची नोंद असून फक्त सहा दिवसच अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. बारामती तालुक्यात ११८.३ टक्के पाऊस झाला असून आठ दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात ८७.४ टक्के पावसाची नोंद असून आठच दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दौंड तालुक्यात ९१.५ टक्के पावसाची नोंद असून अकरा दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर पुरंदर तालुक्यात ५३.३ टक्के पावसाची नोंद असून अवघे सहा दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस बरसला आहे.

एकंदरीतच संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात सरासरी १२ दिवसच अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. सध्या खरीप हंगामातील आर्द्रा नक्षत्र सुरू आहे. खरीप हंगामात शेतकरी बाजरी, भुईमूग, मूग, सोयाबीन, कडधान्ये आदी पिकांची पेरणी करत असतो. मात्र दमदार पावसाअभावी अनेक भागात पेरणीची कामे खोळंबली आहेत.

सध्या हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. काही पिकांच्या पेरणीचा कालावधी समाप्त होऊ लागला आहे. त्यामुळे जमिनीला चांगली ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. अन्यथा दुबार पेरणीची परिस्थिती उद्भवू शकते. पावसाळा सुरू होऊन तीस दिवसांपेक्षा जास्त काळ पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांनी सूर्यफूल, तूर, बाजरी व मका पिकांची पेरणी करावी.

- प्रमोद सावंत, कृषी अधिकारी, पुणे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसmonsoon 2018मान्सून 2018