शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Monsoon Update 2024: देशात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस! कृषी क्षेत्रासाठी चिंतेचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 09:36 IST

अनेक भागात पुरेसा पाऊसच झालेला नाही. जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये, असा सल्लाही ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ देत आहेत...

पुणे : देशात मान्सूनचा या जून महिन्यातील सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे देशातील कृषी क्षेत्राची चिंता वाढविली आहे. कारण या पावसावर बळीराजा अवलंबून असतो. परंतु, आता पेरणी करायची की नाही, या द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी अडकला आहे. अनेक भागात पुरेसा पाऊसच झालेला नाही. जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये, असा सल्लाही ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ देत आहेत.

देशात १७ जूनपर्यंत सरासरी ७४.३ मिमी पाऊस होतो आणि यंदा आतापर्यंत ५९.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर राज्यात सरासरी ९३.४ मिमी पाऊस होतो, आतापर्यंत ९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, महाराष्ट्रात मात्र अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात १ जूनपासून सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झाला आहे. दक्षिणेकडील काही राज्ये वगळता जवळपास सर्वच प्रदेशांमध्ये पाऊस कमी झाला असून, अर्ध्या देशात अजून मॉन्सून पोचलेला नाही. तसेच तो म्हणावा तसा बरसलेला नाही. उत्तरेकडील राज्यांमध्ये तर उष्णतेच्या लाटा जाणवत आहेत. सध्या मान्सूनची प्रगती ठप्प झालेली आहे. तो कमकुवत झाला असून, त्यामध्ये ऊर्जा येण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सामान्यतः, १ जूनच्या आसपास पाऊस दक्षिणेकडे सुरू होतो आणि ८ जुलैपर्यंत देशभर पसरतो. त्यामुळे भात, कापूस, सोयाबीन आणि ऊस यांसारख्या पिकांच्या लागवडीला आधार मिळतो. पण सध्या खूप कमी पाऊस झाल्याने पेरण्याच झालेल्या नाहीत. परिणामी बळीराजा चिंताग्रस्त झालेला आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे, शनिवार व रविवारपासून तापमानात घट होण्याची शक्यता आहे. भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कमाल तापमान सध्या ४२ ते ४७.६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे, जे सामान्यपेक्षा ४-९ अंश सेल्सिअस जास्त आहे. त्यामुळे उत्तरेकडे उष्णतेचा फटका सहन करावा लागत आहे. त्यातच मॉन्सून रेंगाळलेला असल्याने त्याची चिंता लागून राहिली आहे.

उष्णतेची लाट कुठे ?

देशामध्ये उत्तरप्रदेश, बिहार, हिमालचल प्रदेशचा काही भाग, हरियाणा, दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, राजस्थान, झारखंड आणि मध्यप्रदेश या भागात १८ जून रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

१७ जूनपर्यंतचा सरासरी पाऊस

देशात सरासरी ७४.३ मिमी पाऊस होतो. आतापर्यंत झालेला पाऊस ५९.४ मिमी

महाराष्ट्र सरासरी ९३.४ मिमी पाऊस होतो, आतापर्यंत झालेला पाऊस ९९ मिमी

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र