शहरं
Join us  
Trending Stories
1
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
2
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
3
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
4
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
5
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
6
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
7
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
8
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
9
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
10
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
11
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
12
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
13
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
14
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
15
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
16
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
17
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
18
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
19
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?

देशातील बहुतांश विमानतळे तोट्यात, २५ विमानतळांचे खासगीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 10:02 AM

नवी मुंबईसह २५ विमानतळांचे खासगीकरण

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : कोविडनंतर वाहतूक वाढल्याने २०२३-२५ या कालावधीत नागपूरसह आणखी २५ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे. दहा ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी दुर्गापूर, कन्नूर, सिंधुदुर्ग आणि मोपा संबंधित राज्य सरकारांनी खासगी विकासकांच्या मदतीने विकसित केले आहेत. जेवर, भोगापुरम, नवी मुंबई, कराईकल आणि डबरा येथील नवीन ग्रीनफिल्ड विमानतळांचा विकासदेखील खासगी ऑपरेटर्सना देण्यात येत आहे.देशातील विमानतळांची संख्या गेल्या नऊ वर्षात दुप्पट करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊ शकतात. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे शेतकऱ्यांसाठी किसान उडान सुरू करण्याचा विचार करत आहेत. परंतु, पुणे, कोलकाता आणि गोवा तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) नियंत्रणाखालील १२४ विमानतळांपैकी बहुतांश विमानतळांना गेल्या पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. 

एएआयचा गेल्या पाच वर्षातील तोटा ५२८५ कोटी रुपयांचा आहे. या काळात पुणे (महाराष्ट्र), कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि गोवा यांनी नफा कमावला नसता तर तोटा गगनाला भिडला असता. २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये कोविड महामारीमुळे ही तीन विमानतळेही तोट्यात होती. या विमानतळांनी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२० दरम्यान प्रचंड नफा कमावला.

अकोला, जळगाव, जुहू, कोल्हापूर आणि सोलापूरसह एएआयकडून चालवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व  विमानतळांना सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. तिरूपती, अमृतसर, चंदीगड, हैदराबाद, जोधपूर, शिमला, श्रीनगर आणि यांसारखी काही लोकप्रिय पर्यटन स्थळांचा विमान प्रवास गेल्या पाच वर्षांपासून तोट्यात आहे. २०१८-२०२० मध्ये नफा कमावल्यानंतर २०२०-२१ मध्ये १४ खासगी विमानतळांनादेखील १८४७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळ