शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

एव्हरेस्टवीरांमुळे पुणं होतंय ‘माऊंटेनिंग हब’

By admin | Published: May 29, 2015 1:03 AM

अंग गोठवणारी थंडी.. बर्फाळ प्रदेश... आॅक्सिजनची कमी.. अशा परिस्थितीत फक्त समोर दिसणारा एव्हरेस्ट सर करायचा, या एकाच ध्येयाने पछाडलेल्या तरुण गिर्यारोहकांची संख्या वाढत आहे.

प्रियांका लोंढे ल्ल पुणेअंग गोठवणारी थंडी.. बर्फाळ प्रदेश... आॅक्सिजनची कमी.. अशा परिस्थितीत फक्त समोर दिसणारा एव्हरेस्ट सर करायचा, या एकाच ध्येयाने पछाडलेल्या तरुण गिर्यारोहकांची संख्या वाढत आहे. आजच्या नव्या पिढीला लाइफमध्ये थ्रिलिंग गोष्टी करायच्या असल्याने तरुणाई गिर्यारोहणाकडे आकर्षित होत आहे. या एव्हरेस्टवीरांमुळे आज पुण्याची ‘माऊंटेनिंग हब’ म्हणून नवी ओळख होताना दिसत आहे.तरुणांमध्ये गिर्यारोहणाची ‘क्रेझ’ वाढत असतानाच, २९ मे हा ‘एव्हरेस्ट दिन’ म्हणून साजरा केला जातो. ही माहिती बऱ्याच जणांना नाही. तेनसिंग नोर्गे आणि सर हिलरी या दोन तरुणांनी २९ मे १९५३ मध्ये एव्हरेस्टवर पहिले पाऊल ठेवले आणि अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली. एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या मानवाचा मान त्यांना मिळाला. आणि म्हणूनच २९ मे हा दिवस जगभरात ‘एव्हरेस्ट दिन’ म्हणून साजरा केला जातो.जगभरातून गिर्यारोहक हिमालयात ‘माऊंटेनिंग’साठी येतात. पूर्वी बऱ्याचशा सुविधा नसल्याने गिर्यारोहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे. नेपाळ बॉर्डरपासून एव्हरेस्ट पायथ्यापर्यंतचा प्रवास त्यांना पायी करावा लागत असे. परंतु, आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. चांगल्या सुविधा आज गिर्यारोहकांना मिळत आहेत.एव्हरेस्ट चढण्याकडे सर्वसामान्य माणूस एक आव्हान म्हणून पाहतो; परंतु आजच्या मुलांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. गिर्यारोहणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतोय, ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. मी १९९८मध्ये एव्हरेस्ट सर करून महाराष्ट्रातील पहिल्या एव्हरेस्टवीराचा मान मिळविला. त्या वेळी समजले की, तुम्ही जेव्हा एखादी मोहीम आखता व ती पूर्ण करता, त्या वेळचा आनंद हा वेगळाच असतो.- सुरेंद्र चव्हाण, गिर्यारोहक.एव्हरेस्ट सर करणे शक्यच नाही, असे वैद्यकीय शास्त्रानुसार सांगितले होते; परंतु जिद्दीच्या बळावर माणूस आकाशाला गवसणी घालू शकतो, त्याचप्रमाणे त्याने एव्हरेस्टवर पाऊल ठेवून हिमालयच जिंकला आहे. तरुणांचा वाढता प्रतिसाद पाहता पुण्यातून अनेक नागरिक मोहिमेचे नेतृत्व गिरिप्रेमीतर्फे केले जात आहे. २०१२ मध्ये गिरिप्रेमीच्या ११ जणांनी एव्हरेस्ट चढून विक्रम केला आहे.- उमेश झिरपे, संघटक, गिरिप्रेमी संस्थाएव्हरेस्ट चढणे हा खरंच वेगळा अुभव होता. शेवटच्या टप्प्यात माझं सिलेक्शन झालं. वातावरणातील बदल, आजार या सर्व अडचणींना तोंड देत- १९ मे २०१२ रोजी सकाळी ८.३५ ला एव्हरेस्टवर पोचलो. २० ते २५ मिनिटे शिखरावर थांबून स्वप्न साकार झाल्याचा आनंद घेतला.- प्रसाद जोशी, एव्हरेस्टवीर