शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

MPSC: परीक्षार्थींपाठोपाठ राज्यमंत्री बच्चू कडू यांचीही MPSC ला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 19:18 IST

बच्चू कडूंनी लिहलेल्या पत्रामध्ये राज्यात होत असलेल्या महत्त्वाच्या परीक्षा एमपीएससीमार्फत आयोजित करण्याची मागणी केली आहे

पुणे: मागील काही दिवसांपासून आरोग्य भरतीवरून राज्यात मोठा गोंधळ माजला होता. या गोंधळामुळे पहिल्यांदा या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. नंतर या परीक्षा राज्यभरात झाल्या, पण काही ठिकाणी काही प्रमाणात पुन्हा गोंधळ दिसला होता. अशा परीक्षांच्या नियोनातील अभावामुळे राज्यातील लाखों परीक्षार्थींचे भवितव्य टांगणीला लागले आहे. आता राज्य शासकीय सेवेतील सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महामंडळ यातील अराजपत्रित गट-ब व गट-क पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे राबवावी, अशी मागणी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्र लिहून मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांनीही राज्यातील इतर विभागातील भरती एमपीएससीतून करावी अशी मागणी केली आहे.  

बच्चू कडूंनी लिहलेल्या पत्रामध्ये राज्यात होत असलेल्या महत्त्वाच्या परीक्षा एमपीएससीमार्फत आयोजित करण्याची मागणी केली आहे. सद्यस्थितीत राज्य शासनात सुमारे चार ते पाच लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामध्ये दरवर्षी २-३६ सेवा निवृत्तांची भर पडते. गेल्या ७ ते ८ वर्षात नोकरभरती कमालीची रोडावली असून, रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. प्रशासकीय व्यवस्था बळकट करण्यासाठी ही रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. तथापि, गुणवत्ताधारक योग्य उमेदवारांची निवड विश्वासार्ह अशा घटनादत्त स्वायत्त संस्थेकडून होणे अपेक्षित असताना, वादग्रस्त अशा बाह्य यंत्रणेद्वारे भरती प्रक्रिया राबविली जाते. ही बाब गुणात्मक प्रशासनाला बाधा पोहचणारी आहे, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात राज्यमंत्री बच्चू कडूंनी केला आहे. 

अलीकडील वृत्तांकने तसेच विविध संघटना यांची निवेदने यावरून राज्य शासनाने पदभरतीसाठी निवडलेल्या बाह्य कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे. या बाबींमध्ये जर तथ्य असेल तर शासकीय नोकरीच्या स्वप्नपूर्तीसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावून कष्ट करणाऱ्या लाखो गुणवत्ताधारक उमेदवारांचा भ्रमनिरास होईल, अशी चिंता राज्यमंत्री कडू यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षा