शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

MPSC : २०२० पासून रखडलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा

By नम्रता फडणीस | Updated: October 6, 2022 15:15 IST

उमेदवारांची यादी जाहीर करुन त्यांना नियुक्ती देण्यात येणार...

पुणे : सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या (RTO) २०२० पासून रखडलेल्या भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयापुढे झालेल्या सुनावणीनंतर न्या. आर डी धनुका व न्या. कमल खता यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करुन त्यांना नियुक्ती देण्यात येईल, असे अ‍ॅड. तृणाल टोणपे यांनी सांगितले.

जानेवारी २०२० मध्ये एमपीएससीव्दारे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी २४० जागांची जाहिरात काढण्यात आली होती. त्यानंतर १५ मार्च २०२० रोजी पूर्व परीक्षा आणि २४ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. २२ मार्च २०२२ रोजी सामान्य गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. पण सर्व विद्यार्थी हे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून अंतिम गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत होते. भरतीसाठी वाट बघणाऱ्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी अ‍ॅड. असीम सरोदे व अ‍ॅड. तृणाल टोणपे, अ‍ॅड. अजिंक्य उडाणे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

परंतु उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेमुळे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. मुख्य परीक्षेमध्ये चांगले गुण मिळून देखील त्यांना मिळणाऱ्या पदापासून वंचित रहावे लागत होते. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयामार्फत देण्यात आलेल्या निर्णयाविरुद्ध एमपीएससीद्वारे दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये विद्यार्थ्यांकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेमध्ये दि. ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाद्वारे दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेऊन अन्यायग्रस्त विद्यार्थांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून कागदपत्रे तपासणीनंतर त्यांची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात येईल.

उच्च न्यायालयात अशाप्रकारचे खटले प्रलंबित राहणे हा विद्यार्थांवर होणारा मोठा अन्याय आहे. ज्या तरुणांवरती भारताच्या प्रशासकीय सेवेची जबाबदारी आहे ते तरुण न्यायालयीन कचाट्यात अडकल्यामुळे त्यांना प्रशासकीय सेवेपासून वंचित रहावे लागते. म्हणून अशाप्रकारच्या खटल्यांसाठी स्वतंत्र खंडपीठ नेमून हे खटले लवकरात लवकर निकाली काढावेत

- अ‍ॅड. असीम सरोदे, कायदेतज्ञ

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाCourtन्यायालय