शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हिरव्या पुण्याची महापालिका ‘वाट’ लावतीये; पुणेकरांनीच आता हातात छडी घ्यावी - वंदना चव्हाण

By श्रीकिशन काळे | Updated: April 9, 2023 13:28 IST

पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पुणेकरांनी एकत्र आलेचं पाहिजे

पुणे : ‘‘हिरव्या पुण्याची पुणे महापालिका ‘वाट’ लावत आहे. वेताळ टेकडीवरील प्रस्तावित रस्त्यामुळे खूप मोठे नुकसान होणार आहे. महापालिकेत केवळ प्रशासक असल्याने त्यांचेच राज चालत आहे. म्हणून मनमानी प्रमाणे निर्णय घेतले जात असून, त्यांना विरोध करणारे लोकप्रतिनिधी तिथे नाहीत. आता कोणत्याही माजी नगरसेवकाला महापालिकेत विचारले जात नाही. त्यामुळे पुणेकरांनीच आता हातात छडी घेऊन महापालिकेला जाब विचारला पाहिजे,’’ असे खासदार वंदना चव्हाण यांनी आवाहन केले.

वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. त्या पर्यावरणाविषयी अधिक संवेदनशील असल्याने त्यांना समितीच्या वतीने आयोजित केलेल्या टेकडी बचाव कार्यक्रमात बोलवण्यात आले होते. त्या वेळी चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

चव्हाण म्हणाल्या, गेल्या काही वर्षांपासून पुण्याची अक्षरश: धुळधाण होत आहे. वाहनांची संख्या वाढतेय, पण पर्यावरण मात्र बिघडतेय. मुठा नदीची देखील वाईट अवस्था केली आहे. नदी पात्रात आता जाऊन पाहिल्यानंतर प्रचंड वेदना होतात. तिथे राडारोडा, सिमेंटचे मोठे पोल पडलेले आहेत. बंडगार्डनला जे काम सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांना भविष्यात पुराचा फटका बसणार आहे. तरी देखील तो प्रकल्प रेटला जात आहे.’’

वेताळ टेकडी बचावसाठी नागरिक एकत्र येत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. पुणे हे टेकड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, आता त्यावरही अतिक्रमण होत आहे. आताचा प्रस्ताव टेकडीला संपवणार आहे. भविष्यात पुण्याचे हवामान प्रचंड बदललेले असेल. त्यामुळे आताच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पुणेकरांनी एकत्र आले पाहिजे,’’ असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेVandana Chavanवंदना चव्हाणSocialसामाजिकPoliticsराजकारणenvironmentपर्यावरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका