शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

भीमा नदीपात्रात सापडलेल्या सात मृतदेहांचे गूढ उघडले; चुलत भावांनी घडविले सामूहिक हत्याकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 17:52 IST

बदला घेण्यासाठी चुलत भावांनी सात जणांचे सामूहिक हत्याकांड केले...

- संदीप चाफेकर

यवत (पुणे) : यवत पोलिस स्टेशन हद्दीतील पारगाव (ता. दौंड) येथे भीमा नदीच्या पात्रात सापडलेले सातही जणांची हत्या केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चुलत भावांनी सात जणांचे सामूहिक हत्याकांड केले असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

याबाबतची पत्रकार परिषद पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी यवत पोलिस ठाण्यात घेतली. सामूहिक हत्याकांडाचा तपास पोलिसांनी केला असून, पाच आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. पोलिसांनी खून करणाऱ्या आरोपी अशोक कल्याण पवार (वय ३९), श्याम कल्याण पवार (३५), शंकर कल्याण पवार (३७) प्रकाश कल्याण पवार (२४) व कांताबाई सर्जेराव जाधव (४५, रा. ढवळे मळा, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर ) यांना अटक केली आहे. आरोपी मयतचे चुलत भाऊ आहेत. पोलिस तपासात आरोपी अशोक कल्याण पवार यांचा मुलगा धनंजय याचा काही महिन्यांपूर्वी वाघोली येथे अपघाती मृत्यू झाला होता. त्यामध्ये मयत मोहन उत्तम पवार व त्याचा मुलगा अनिल मोहन पवार हेच जबाबदार आहेत, असा संशय आरोपींना होता. तोच राग त्यांच्या मनात होता. त्या कारणावरून बदला घेण्यासाठी आरोपींनी सामूहिक हत्याकांड घडवून आणले असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

पारगाव येथील भीमा नदीच्या पुलालगत बुधवार (दि. १८) ते रविवार (दि. २२) च्या दरम्यान पोलिसांना सात मृतदेह मिळून आले होते. एकाच वेळी तब्बल सात मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली होती. अनोळखी मयत इसमांच्या नातेवाइकांचा शोध यवत पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण करीत होते. त्यापैकी शुक्रवारी (दि. २०) रोजी नदीपात्रात मिळालेल्या मयत महिलेजवळ एक मोबाइल सापडला त्यावरून मयतांचे नातेवाइकांचा शोध पोलिसांनी लावला.

मयतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला व तीन लहान मुलांचा समावेश होता. मयत मोहन पवार हे पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई, मुलगी राणी, जावई श्याम, नातू रितेश, छोटू, कृष्णा यांच्यासह मुलगा अनिल याच्याबरोबर मागील एक वर्षापासून निघोज, ता. पारनेर येथे राहून मजुरी काम करत होते.

एकाच वेळी सात मृतदेह भीमा नदीच्या पात्रात मिळून आल्याने सुरुवातीला सामूहिक आत्महत्या आहे की काय, अशी चर्चा सुरू होती. मयत इसमांच्या अंगावर कसल्याही मारहाणीच्या जखमा नसल्याने अशी चर्चा केली जात होती. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी योग्य दिशेने तपास सुरू ठेवला. तपासादरम्यान काही पुरावे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यावरून सर्वांची हत्या केली असल्याचा शोध पोलिसांनी लावला.

नाहीतर प्रकरण दडपले असते...

अपघाती मृत्यू नसून खून असल्याच्या संशयावरून चुलत भावांनीच संपूर्ण कुटुंबाचा खून केला. सदर सामूहिक हत्याकांड करणारा आरोपी सुशिक्षित नाहीत. मात्र त्यांनी केलेला गुन्हा समोर येण्यास आठवडा गेला. पोलिसांनी आकस्मित मयतांचा तपास करताना खोलवर तपास केला नसता तर कदाचित हा प्रकार उघडकीस आला नसता. मात्र पोलिसांनी घटनेतील बारकावे लक्षात घेत योग्य तपास केल्याने सदर हत्याकांड उघडकीस आले.

सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शेळीमकर, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, शिवाजी ननावरे, संजय नागरगोजे, सहायक फौजदार तुषार पंदारे, हनुमंत पासलकर, मुकुंद कदम, काशीनाथ राजापुरे, पोलिस हवालदार सचिन गाडगे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, अजित भुजबळ, मंगेश थिगले, योगेश नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकांत जाधव, प्रमोद नवले, नीलेश शिंदे, धीरज जाधव, मंगेश भगत, तुषार भोईटे, अमोल शेडगे, दगडू वीरकर, अक्षय सुपे, नीलेश कदम, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, अक्षय यादव, अजित काळे, प्रमोद गायकवाड यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस