शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

‘ना थकता हूं ना थकने देता हूं’, एवढा कार्यक्षम नेता पहिल्यांदाचा पाहिला, जावडेकरांकडून मोदींचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:34 IST

समोरील व्यक्तीचे म्हणणे प्रतिवाद न करता शांतपणे ऐकून घेणे हे नरेंद्र मोदींचे स्वभाव वैशिष्ट्य असून त्यांची कार्यक्षमता अफाट आहे

पुणे : गुजरातचे मुख्यमंत्री असताना ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर पंतप्रधान झाल्यावर ‘ना थकता हूं ना थकने देता हूं’ असे सहज स्वर्गीय अरुण जेटली गमतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून म्हणाले होते आणि यावर एकच हशा पिकला होता. तर नवरात्र असल्याने उपवासाचे दिवस होते. त्या दरम्यान पंतप्रधानांना अमेरिकेचा दौरा करावा लागला. उपवासादरम्यान मोदींनी १०० तासांत ५० कार्यक्रम केले. एवढा कार्यक्षम नेता माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला, असे मत भाजपा नेते तथा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

ते संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आँख ये धन्य है’ आणि ‘साक्षी भाव’ या पुस्तकांमधील कवितांवर आधारित ‘मन का गीत’ या विशेष कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी मोनिका मुरलीधर मोहोळ, प्रसिद्ध रंगकर्मी आणि कार्यक्रमाचे दिग्दर्शक योगेश सोमण, संगीत संयोजक डॉ. सलील कुलकर्णी, संवाद पुणेचे सुनील महाजन, माजी नगरसेवक आदित्य माळवे, माधवी सहस्त्रबुद्धे, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी, नृत्य दिग्दर्शक निकिता मोघे आणि ‘मन का गीत’ कार्यक्रमाची संहिता लिहिलेल्या डॉ. माधवी वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले.

प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले की, मोदी हे अत्यंत संवेदनशील व्यक्ती असल्याने त्यांच्याकडून काव्यनिर्मिती झाली आहे. ते संन्यस्त कर्मयोगी आहेत. समोरील व्यक्तीचे म्हणणे प्रतिवाद न करता शांतपणे ऐकून घेणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असून त्यांची कार्यक्षमता अफाट आहे. पंतप्रधान म्हणूनच नव्हे, तर एक संवेदनशील कवी म्हणून मी त्यांना जवळून पाहिलेले आहे.

दिग्दर्शनाची बाजू अभिनेते योगेश सोमण यांनी सांभाळली. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रभावी अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनिस आणि अक्षय वाटवे यांनी केले. विविध गीते, कवितांवर शिल्पा दातार, शर्वरी ओतरी, श्रुतिका अत्रे, अदिती देवधर, ईश्वरी बापट, प्राजक्ता सांभू, अंतरा बोरगावकर यांनी नृत्याविष्कार सादर केला. महेश लिमये (दृकश्राव्य), अक्षर वडके (प्रकाश योजना), अमन वरखेडकर (की बोर्ड) यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी, तर संयोजन केतकी महाजन-बोरकर यांनी केले.

कविता संगीतबद्ध करता आल्या हे भाग्य : डॉ. सलील कुलकर्णी

फार चांगला योग आहे. कारण पंतप्रधानांच्या कवितांना संगीतबद्ध करता आले. अनेक प्रकारच्या कविता आपण वाचतो. पण अनेक शब्द मला या कवितांच्या माध्यमातून समजली. भारतासह परदेशात भ्रमंती करणारे आणि अनुभव पाठीशी घेऊन त्यातून कविता साकारल्या गेल्या आहेत. यात शैक्षणिक, नैसर्गिक आणि हिंदुत्व अशा सर्व गोष्टी दिसतात. तसेच कवितांच्या माध्यमातून त्यांची संवेदनशीलता समजली.

टॅग्स :PuneपुणेPrakash Javadekarप्रकाश जावडेकरNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपा