शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

Video: आरारारा..! सेलिब्रेशनच्या नावाखाली मित्रांनी केला 'बर्थ डे बॉय'वर अंड्यांचा तुफान मारा

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: December 15, 2020 18:26 IST

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

पुणे : वाढदिवस साजरा करण्याच्या नव्या नव्या पद्धतीसमोर येत आहे.रस्त्यावर तलवारीने, कोयत्याने यांनी केक कापत धिंगाणा घातल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. काहीजणांवर पोलीस गुन्हा देखील दाखल केले जातात. मात्र असे भयानक प्रकार थांबण्याचे काही नाव घेताना दिसत नाही. अशाच  प्रकारे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे काही तरुणांनी आपल्या मित्राचा अजब-गजब प्रकारे वाढदिवस साजरा केला. पण हा धिंगाणा 'बर्थ डे बॉय' सह त्याच्या मित्रांना चांगलाच महागात पडला आहे. 

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे सकलेन नासिर शेख याचा नुकताच १८ वा वाढदिवस होता. यावेळी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या मित्रांनी केक कापल्यानंतर जमलेल्या त्याच्या मित्रांनी एकमेकांना अंडी फेकून मारत परिसरात चांगलाच धुडगुस घातला. नारायणगाव पोलिस ठाण्यात बर्थ डे बॉय आणि त्याच्या ६ मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, नारायणगाव येथील मुक्ताई मंदिर परिसरात सकलेन व त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. इथपर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होते. ;पण त्यानंतर काहीच वेळात सकलेनच्या मित्रांनी त्याला जोरजोऱ्यात अंडी फेकून मारण्यास सुरुवात केली.  या धिंगाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. पोलिसांना ज्यावेळी या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी या तरुणांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे सकलेन आत्तार, साकीर आमीन जमादार, आरमान खालीद शेख, मोईन अकलाक आत्तार, मोसीन फिरोज ईनामदार, जाहिद पिरमहम्मद पटेल. (सर्व रा. मुस्लिम मोहल्ला, नारायणगाव) अशी आहेत. नारायणगाव पोलीस स्टेशनचे दत्तात्रय गुंड यांनी या धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

वाढदिवस साजरा करण्याच्या 'हटके' स्टाईलच्या नावाखाली पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये तलवारी,कोयते यांच्या साह्याने केक कापण्याच्या घटना प्रमाणात घडत आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात तरी ती अशा घटनांना रोखण्यात कमी पडत आहे. या  वाढदिवस साजरा करण्यापाठीमागे परिसरात दहशत निर्माण करण्याचा हेतू असतो.मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड,औरंगाबाद यांसारख्या मोठं मोठ्या शहरापुरते मर्यादित असलेले असे भयानक प्रकार आता गाव व तालुका पातळीवर सुरु झाले आहे. पोलिसांनी लवकर जर अशा प्रवृत्तींना आळा घातला नाहीतर समाज जीवन धोक्यात येणार आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर खाकी वर्दीची जरब बसणे अत्यंत गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :narayangaonनारायणगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस