शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

जिल्हा परिषदेतील टंचाई कक्ष नावापुरता

By admin | Published: March 17, 2016 3:02 AM

जिल्ह्यात ६४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. १४४ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला याचे

- बापू बैलकर,  पुणेजिल्ह्यात ६४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. १४४ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. येथे स्थापन करण्यात आलेला टंचाई कक्ष हा नावापुरताच आहे. फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात टंचाईची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषदेने तातडीची बैठक घेऊन अध्यक्ष प्रदीप कंद यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. यात जिल्हा परिषदेत स्वतंत्र टंचाई कक्ष तत्काळ स्थापन करण्यात यावा व दररोजचा अहवाल सायंकाळी ४ वाजेपर्यंत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार १६ फेबु्रवारी रोजी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आदेश काढून १४ जणाच्या टीमवर जबाबदरी निश्चित करून दिली.या टीमचे प्रमुख म्हणून उपकार्यकारी अभियंता चाटे यांच्यावर जबाबदारी दिली. त्यांनी आदेशात नमूद करून दिलेल्या सर्व कामकाजावर समन्वय ठेवायचा आहे. तसेच नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्याशी संबंधित माहिती सायंकाळी ४ वाजेपर्यंत सादर करावी. ही संकलित माहिती प्रमुखाने जिल्हाधिकारीस्तरावर सादर करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या टंचाई कक्षाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना टंचाई कक्ष शोधूनही सापडत नव्हता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या दालनात माहिती घेतली असता, टंचाई कक्ष आहे का नाही, हे तेथील कर्मचाऱ्यांनही माहीत नव्हते. टंचाईकाळात पाणीपुरवठा विभाग काम पाहतो म्हणून पाणीपुरवठा विभागात माहिती घेतली असता, तेथे टंचाई कक्षाचा कुठलाही फलक लावलेला दिसला नाही. कार्यकारी अभियंते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. मग उपकार्यकारी अभियंता चाटे यांच्याकडे टंचाई कक्षाची माहिती विचारली असता त्यांनी होय टंचाई कक्ष स्थापन केला असून, मीच त्याचा प्रमुख आहे, असे सांगितले. त्यांना टंचाईची माहिती विचारली असता बैैठकीला जायाचेय, भाऊसाहेबांकडून माहिती घ्या, असे सांगितले. संबंधित भाऊसाहेबांकडे गेलो असता, मी अध्यक्ष साहेब किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय माहिती देऊ शकत नाही, असे सांगितले. मात्र, त्याच दरम्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईसंदर्भातच बोलत होते. त्यांचे बोलणे झाल्यानंतर त्यांनी टंचाई आराखड्याच्या अंमलबजावणीची माहिती त्यांना हवी होती ती देत होतो, असे सांगितले. त्यांना ही माहिती दररोज एकत्र संकलित केली जात नाही का? असे विचारले असता, मी आताच संबंधितांना फोन करून कशीबशी ही माहिती घेतल्याचे सांगितले. बुधवारी पुन्हा चाटे यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, विंधन विहिरी भुसे यांच्याकडे मिळेल, प्रादेशिक पाणीपुरवठा बुरसे यांच्याकडे मिळेल, टँकरची माहिती त्यांच्याकडे मिळेल...असे सांगितले. संकलित माहिती मिळालीच नाही. मुळात टंचाई कक्ष स्थापन करून प्रमुखाने दररोज दिलेल्या कामांची माहिती संकलित करून ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देणे अपेक्षित आहे किंवा आदेशात तसे नमूद केले आहे, मात्र याचे गांभीर्य तेथे दिसले नाही. टंचाईबाबत तक्रार कुठे करायची? जिल्हा परिषदेत १३ तालुक्यांतून दररोज कामासाठी ग्रामस्थ येत असतात. त्यांना त्यांच्या गावातील टंचाईबाबत काही तक्रार करायची असेल किंवा माहिती द्यायची असेल, तर त्यांनी कुठे द्यायची? कारण प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर कुठेही टंचाई कक्ष या मजल्यावर आहे, यांच्याशी संपर्क साधा, असा फलक नाही. तसेच, पाणीपुरवठा विभागातही असा फलक लावलेला नाही.