शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

Sharad Pawar: मोदींना सरकार बनवण्यासाठी चंद्रबाबू, नितीशकुमारांची मदत घ्यावी लागली - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 11:00 AM

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ठोस पावले टाकणारे हे सरकार असेल, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली

बारामती : मोदीसाहेबांनी (Narendra Modi) सरकार बनवले. पण त्यासाठी त्यांना चंद्रबाबू (Chandrababu Naidu), नितीशकुमार(Nitish Kumar) यांची मदत घ्यावी लागली. हे विसरुन चालणार नाही. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ठोस पावले टाकणारे हे सरकार असेल, अशी अपेक्षा पवार शरद (Sharad Pawar) पवारांनी व्यक्त केली. बारामतीत आयोजित व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. सामान्य माणसांच्या सामूहिक शहाणपणामुळे देशाची लोकशाही टीकली. गेली १० वर्ष राज्यकर्ते प्रत्येक गोष्टीत टाेकाची भुमिका घेत होेते. त्या राज्यकर्ते यांना जमीनीवर पाय टेकवले पाहिजेत, हा संदेश सर्वसामान्य जनतेने लोकसभा निवडणुकीतून दिला, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना  लगावला. 

यावेळी पवार पुढे म्हणाले,  एकंदरीत देशाच्या निकालाचे चित्र पाहिल्यास पाच वर्षांपुर्वी  आणि आज सत्तेत असणाऱ्यांना ३०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यात ६० जागांची घट झाली आहे. यात उत्तर प्रदेश हे महत्वाचे राज्य आहे. राम मंदीर हा प्रचाराचा मुद्दा असेल, राममंदीराचे मतदान सत्ताधाऱ्यांकडे जाइल, असे निवडणुकीपुर्वी  वाटले होते. मात्र, मंदीराच्या नावाने मते मागितल्यावर लोकांनी वेगळा निकाल दिला. अयोध्येमध्ये भाजपचा पराभव झाला. ज्या ठीकाणी मंदीर झाले, तेथील सामान्य लाेकांनी मंदीराचे राजकारण दुरुस्त केल्याचा टोला पवार यांनी लगावला.  बारामतीच्या निवडणुकीबाबत त्यावेळी माध्यमांमधून अनेक गोष्टी पुढे येत होत्या, पण बारामतीकर शहाणे आहेत.हे मला माहिती असल्याने  मी शांत होतो.बारामतीकरांचा शहाणपणा या निवडणुकीच्या निमित्ताने पहावयास मिळाल.१२५० बुथपैकी ११९० बुथवर आम्हाला बहुमत  मिळाले.१९६७ पासून हा शहाणपणा अनुभवयास मिळत आहे.बारामतीकर शहाणपणापासून बाजूला गेले नाहीत.या बारामतीची चर्चा यंदा न्युयाॅर्कपर्यंत पोहचली.बारामतीकर साधे नाहीत,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभेत बारामतीकरांनी दिलेल्या मताधिक्यक्यावर कृतज्ञता व्यक्त केली. निवडणूक झाली. लोकांनी काय निकाल द्यायचा तो दिला. आता जबाबदारी कामाची आहे. बारामतीसह जिल्ह्यातील अन्य एमआयडीसींमध्ये मोठे उद्योग लवकरच आणले जातील, त्यासाठी केंद्र व राज्याची मदत घेतली जाईल, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNitish Kumarनितीश कुमार