शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 20:10 IST

काँग्रेस साठ ते सत्तर वर्षे सत्तेत राहूनही गरिबी हटवण्यात त्यांना यश आले नाही

बारामती : इंदीरा गांधी यांनी त्यांच्या काळात गरीबी हटावचा नारा दिला. मात्र, ६० ते ७० वर्ष सत्तेत राहुन त्यांना ते जमले नाही. गरिबी हटविण्यात त्यांना यश आले नाही. भ्रष्टाचार करत काॅंग्रेस पुढे जात राहिली, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काॅंग्रेसवर टीका केली.

बारामती येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आठवले बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री आठवले पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले मोठे घोडेस्वार आहेत. मोदी यांचा घोडा अडविण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्याकडुन होत आहे. मात्र, राहुन गांधी यांच्यात तेवढी ताकत नाही. तसा प्रयत्न झाल्यास त्यांना तुडवत मोदींचा घोडा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, असा टोला आठवले यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले,आम्ही गरीब आहोत, पण आम्ही इमानदार आहोत. ज्यांच्याशी नाते जोडतो, त्यांना आम्ही धोका देत नाही. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मान राखुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी एकनिष्ठ राहुन आम्ही महाराष्ट्रात राजकारण केल्याचे आठवले म्हणाले. उध्दव ठाकरे यांचा थयथयाट चाललेला आहे. संजय राऊत आज उलटसुलट भाषा वापरतात. महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे, असे ते म्हणतात. मात्र, आम्ही कोणाचा पक्ष फोडलेला नाही. एकनाथ शिंदे त्यांचे आमदार घेऊन आमच्याकडे आले. उध्दव ठाकरे आम्हाला सोडुन काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसबरोबर गेले, ती गध्दारी नव्हती का, तुम्ही असे करणे अपेक्षित नव्हते, असा सवाल यावेळी आठवले यांनी केला. अगोदर ठाकरे यांनी गध्दारी केली. भाजपच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसल्याचे आठवले म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती...भीमशक्तीची भुमिका मांडली. त्याला आम्ही पाठींबा दिला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. ठाकरे आमच्यासोबत असते तर धनुष्यबाण कोणी हिरावुन घेवु शकले नसते. त्यांच्या ५४ आमदारांपैकी पैकी ४० आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. बहुमत त्यांच्याकडे असल्याने चिन्ह त्यांना मिळाले, हा कायदा असल्याचे आठवले म्हणाले. अजित पवार देखील ४२ आमदार घेऊन आले. कोणाला भीती दाखविण्याची आवश्यकता नव्हती. पवार यांच्या मनात भाजपसमवेत जायचे होते, असे देखील आठवले यांनी सांगितले.

भाषणात आठवलेंच्या कविता 

१)बरीच वर्ष मी होतो माननीय शरद पवार साहेबांचा साथी.. पण  आता मी आहे अजितदादांचा साथी...त्यामुळे सुनेत्रा पवार यांना निवडुन आणण्यासाठी आलेलो आहे बारामती...नरेंद्र मोदींनी वाढविली विकासाची गती...म्हणुन बारामतीत विजयी होणार महायुती.

२)लढाइ आहे पवार विरुध्द पवारआमच्या वहिनीच होणार आहे लोकसभेवर संवार.

३) हम तो नही करते बात बडी बडीलेकीन चुनकर आनेवाली है सुनेत्रा पवार की घडी.

टॅग्स :Puneपुणेbaramati-pcबारामतीbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sunetra Pawarसुनेत्रा पवारRamdas Athawaleरामदास आठवले