शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"लखीमपूऱच्या ताज्या घटनेवर मोदींनी भाष्य करावे", पुण्यातून काँगेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 18:53 IST

केंद्र सरकारची सर्व धोरणे देशविघातक अशी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटलांची टीका

ठळक मुद्देसमाजातील बुद्धींवत वर्ग आता काँग्रेसकडे झूकू लागला आहे

पुणे: उत्तरप्रदेशात लखीमपूरमध्ये मारले गेलेले शेतकरी आंदोलनांमधीलच होते. पंतप्रधान मोदी यांनी आता तरी मौन सोडून भाष्य करावे अशी मागणी काँग्रेस करत असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारची सर्व धोरणे देशविघातक असल्याची टीका त्यांनी केली.

काँग्रेसभवनमध्ये मंगळवारी दुपारी पाटील यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व अन्य प्रदेश पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, लखीमपूरमधील घटनेनंतर काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी शेतकऱ्यांच्या सांत्वनासाठी म्हणून निघाल्या. उत्तरप्रदेश सरकारने त्यांना ताब्यात घेतले, या घटनेचा काँग्रस निषेध करत आहे. वर्ष होत आले शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानीत आंदोलन करत आहेत व मोदी त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. लखीमपूऱच्या ताज्या घटनेत एकदोन नाही तर आठ शेतकरी प्राणाला मुकले आहेत, किमान त्यावर तरी पंतप्रधान म्हणून मोदी यांनी बोलावे अशी आमची मागणी आहे.

''केंद्र सरकार विदेशी कंपन्यांसाठी भारतात पायघड्या घालत आहेत. त्यांची आर्थिक धोरणे देशाला मारक होत आहेत. समाजाचा एकही घटक समाधानी नाही. देशातील मध्यमवर्गाची मोदी फसवणूक करत आहेत असा आरोप पाटील यांनी केला.''

''काँग्रेसनेच नेहमीच जबाबदारीने कारभार केला. मोदी यांच्या सरकारमध्ये जबाबदारीच दिसत नाही अशी टीका पाटील यांनी केली. महाराष्ट्र काँग्रेस चांगले काम करत आहे, समाजातील बुद्धींवत वर्ग आता काँग्रेसकडे झूकू लागला आहे असा दावा पाटील यांनी केला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पटोले यांच्या हस्ते पाटील यांचे स्वागत केले.''

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरी