शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

राष्ट्रवाद, स्वच्छ प्रतिमेमुळेच कमळ फुलले : व्यापार क्षेत्राचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 20:58 IST

राष्ट्रवाद, सरकारची स्वच्छ प्रतिमा, धाडसी निर्णय ही कारणे अधिक प्रभावी ठरली असल्याचे मत व्यापार क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

ठळक मुद्देनोटबंदी, जीएसटी नंतरही व्यापारी भाजपच्या पाठीशी

पुणे : नोटबंदी, वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणी नंतर उडालेला गोंधाळ...जीएसटीतील न सुटलेले प्रश्न..अशा अनेक अडचणी असूनही व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाला साथ दिली. राष्ट्रवाद, सरकारची स्वच्छ प्रतिमा, धाडसी निर्णय ही कारणे अधिक प्रभावी ठरली असल्याचे मत व्यापार क्षेत्रातून व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत नोटबंदी करीत पाचशे आणि हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद केल्या. बाजारातून काळापैसा काढण्यासाठी नोटबंदीचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. बाजारातून काळापैसा हद्दपार झालाच नाही. त्यामुळेच यंदाच्या प्रचारातही नोटबंदी यश असल्याची टिमकी सरकारने वाजवली नाही. जीएसटीच्या अंमलबाजवणी नंतर निरीक्षक राजपासून त्याच्या कर आकारणीचे देखील अनेक मुद्दे व्यापाऱ्यांनी उपस्थित केले. त्यावरुन आंदोलनही छेडले. अजूनही व्यापाºयांच्या म्हणण्याप्रमाणे जीएसटी सुरळीत झालेला नाही. सर्व अडचणी मतदारांनी मान्य करीत, पुन्हा एकदा मोदी यांच्या हाती सत्ता दिली. उलट मोदी लाटेवेळी आलेल्या जागांपेक्षा अधिक जागा मतदारांनी बहाल केल्या. निवडणुकीपूर्वी जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला, त्याला भारताने दिलेले चोख प्रत्युत्तर, राष्ट्रवाद आणि धडाकेबाज निर्णय यामुळे मतदार प्रभावित झाल्याचे दिसून येते. प्रचारामधून विकासा ऐवजी राष्ट्रवादाचा मुद्दा घेण्यात आला. त्याला मतदारांनी देखील प्रतिसाद दिला. मोदी लाटेपेक्षा अधिक जागांवर भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले. ग्राहक पेठेचे संचालक सूर्यकांत पाठक म्हणाले, अजूनही खालच्या पातळीवरील भ्रष्टाचार कायम असला तरी मंत्र्यांच्या पातळीवरील भ्रष्टाचार रोखला गेला आहे. मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. जीएसटी आणि नोटबंदी याकाळात अनेकांना त्रास झाला. मात्र, सर्वाधिक त्रास काळाबाजार करणाºयांना झाला. व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे जीएसटीच्या कर रचनेत बदल करण्यात आला. दरमहा ऐवजी तीन महिन्यांतून एकदा जीएसटी भरण्याची मुभा देण्याची मागणी आहे. अशा अनेक सुधारणा प्रलंबित आहेत. मात्र, राष्ट्रवादाची दिलेली हाक अधिक प्रभावी ठरली. भाजपने जाहीरनाम्यामधे व्यापारी वर्गासाठी महामंडळाच्या धरतीवर स्वतंत्र व्यवस्था उभारण्याची घोषणा केली. जीएसटीतील कररचनेमध्ये सुधारणा केली. काही वस्तूंना सवलत दिली. कॉंग्रेसने कधीही व्यापाºयांना आपल्या जाहीरनाम्यात स्थान दिलेले नाही, त्यामुळे व्यापारी वर्ग भाजपाच्या मागे राहिल्याचे गूळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित सेटिया यांनी सांगितले.  गेल्या लोकसभा निवडणूकीत पत्रकार परिषद देऊन भाजपला पाठिंबा दिला होता. जीएसटीत ब्रँडेड वस्तूंवर ५ टक्के कर असून, ब्रँडेड नसलेल्या वस्तूंवर सूट आहे. अन्न आणि औषध प्रशासन कायद्यानुसार परवानाप्राप्त व्यापाºयाने परवाना नसलेल्या व्यापाऱ्यास माल विकल्यास दोघांनाही ५० हजार दंड आहे. अशा अनेक व्यापारी विरोधी तरतूदी आहेत. नोटबंदी आणि जीएसटी या दोन्हीचा त्रास झाला असूनही, व्यापाऱ्यांनी स्थिर सरकारसाठी भाजपाला साथ दिल्याचे पुणे मर्चंट्स व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालbusinessव्यवसाय