शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

नैसर्गिक अभिनय हीच डाॅ. श्रीराम लागूंच्या अभिनयाची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 13:57 IST

डाॅ. श्रीराम लागूंच काम तरुण रंगकर्मींसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिलं आहे. त्यांच्या निधनांतर त्यांच्याप्रती तरुण रंगकर्मींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुणे : डाॅ. श्रीराम लागू आणि नाटक हे एकप्रकारे समीकरणच हाेते. त्यांच्या सहज, नैसर्गिक अभिनयाने त्यांनी नाटक खऱ्या अर्थाने जीवंत केलं. त्यांच्या नाटकांचे विषय देखील वेगळे असायचे. ते आपल्या नाटकांच्या बाजूने खंबीर उभे सुद्धा राहायचे. रंगभूमी गाजवलेल्या रंगमंचावरील 'नटसम्राटा'बद्दल तरुण रंगकर्मींच्या भावना 'लाेकमत'ने जाणून घेतल्या.

डाॅ. श्रीराम लागू यांना रंगमंचावर काम करताना पाहता आलं त्यामुळे आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. सूर्य पाहिलेला माणूस आणि त्यांच्या इतर नाटकांमधून त्यांना रंगमंचावर काम करताना पाहणं ही खरंच माेठी पर्वणी हाेती. असा माणूस या आधी झाला नाही आणि पुढे हाेणेही शक्य नाही. त्यांनी लिहीलेलं 'लमाण' हे पुस्तक आम्ही एक वस्तूपाठ म्हणून वाचताे. माझ्या काही नाटकांचे प्रयाेग त्यांनी पाहिले हाेते. त्यांनी माझं नाटक बघणे हीच माझ्यासाठी माेठी गाेष्ट हाेती. 

- मुक्ता बर्वे

डाॅ. श्रीराम लागू आम्हा सर्वांसाठीच आदर्श हाेते. आमच्या संबंध पिढीवर त्यांच्या अभिनयाचा प्रभाव हाेता. त्यांचा अभिनय हा नैसर्गिक असायचा, खरा अभिनय ते करायचे. अभिनय करत असताना त्यामागे त्यांचा एक विचार असायचा, वैचारिक बैठक असायची. ते अभिनय करताना अनेक गाेष्टी ठरवून करायचे. परंतु त्या कधीच कृत्रिम वाटायच्या नाहीत. त्या नेहमीच नैसर्गिक वाटायच्या आणि हिच त्यांच्या अभिनयाची खरी खासियत हाेती. त्यांच्या अभिनयात अदभुत ताकद हाेती. त्यांचा हाच गुण घेण्याचा आम्ही सर्व कलाकारांनी प्रयत्न केला आहे.

- सुबाेध भावे

डाॅ. श्रीराम लागू हे अतिशय विवेकवादी व्यक्ती हाेते. ते एक विचार करणारे अभिनेते हाेते. त्यांनी नेहमीच नाटकातील भूमिकेच्या पलिकडची मते देखील मांडली. वाचिक अभिनयावर त्यांनी लेखन केलं. त्यांच्या नाटकांचे विषय खूप वेगळे हाेते. त्यांनी नेहमीच कलाकार म्हणून भूमिका घेतल्या. नाटकांच्या बाजूने उभे राहिले. कलाकरांच्या अभिनयामध्ये शिस्त आणण्याचंं काम सुद्धा त्यांनी केलं. ते नेहमीच चळवळीत राहून काम करायचे. त्यांनी डाॅ. नरेंद्र दाभाेळकरांबराेबर अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम देखील केले. त्यांनी त्यांच्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ तन्वीर सन्मान सुरु करुन प्रायाेगिक नाटकांना प्राेत्साहन देण्याचे काम केले.

- आलाेक राजवाडे

मी 17 वर्षांचा असताना डाॅ. श्रीराम लागूंसाेबत रंगमंचावर काम करण्याची संधी मिळाली. नटसम्राट हे नाटक निर्मात्यांना चित्रीत करुन जतन करुन ठेवायचे हाेते. लागू साेडले तर सर्व कलाकार त्यावेळी नाटकात नवे हाेते. त्यांच्यासाेबत त्यावेळी काम करण्याचा अनुभव अदभुत हाेता. तालमीच्या वेळी त्यांच्यासमाेर उभे राहताना दडपन यायचे. लागू नेहमी स्वतःबराेबरच समाेरच्याचा अभिनय कसा चांगला हाेईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचे. सध्या अभिनय ही कला करप्ट हाेत चालली आहे. व्हिडीओ तयार करुन साेशल मीडीयावर टाकले तरी त्याला अभिनय समजण्यात येत आहे. गाण्यासारखा अभिनयामध्ये देखील रियाज महत्त्वाचा आहे असे लागूंचे मत हाेते. मला जेव्हा संधी मिळायची तेव्हा मी त्यांची भेट घेत असे. नैसर्गिक अभिनय हाच त्यांच्या अभिनयाचा मुळ गाभा हाेता.

- अमेय वाघ

टॅग्स :PuneपुणेShriram Lagooश्रीराम लागूDeathमृत्यू