शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

Navale Bridge Accident: उतार कमी करणार! अपघात रोखण्यासाठी सल्लागाराची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 09:59 IST

सातारा-मुंबई महामार्गावर नवले पुलाजवळ रविवारी भरधाव ट्रकने ४८ वाहनांना उडवले आणि सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली

- कल्याणराव आवताडे

धायरी (पुणे) : स्वामी नारायण मंदिर ते नवले पूल हे सहा किलोमीटरहून अधिक अंतर आहे. मागील आठ वर्षांत येथे १८५ हून अधिक अपघात झाले असून, यात ६६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तीव्र उतार हेच येथील अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आल्याने स्वतंत्र समिती नेमून ३ टक्क्यांपर्यंत ग्रेडियंट कमी केले जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.

सातारा-मुंबई महामार्गावर नवले पुलाजवळ रविवारी (दि. २०) भरधाव ट्रकने ४८ वाहनांना उडवले आणि सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही निर्णय घेतले गेले. अनेक अपघाताच्या घटनांचा अभ्यास केला असता, वाहनचालकांची चुकी, ब्रेक फेल, अवजड वाहनांवरील नियंत्रण सुटणे अशीच कारणे समोर येतात. बऱ्याचवेळेला काही अवजड वाहनांचे चालक इंधन वाचविण्यासाठी वाहन ‘न्यूट्रल’ किंवा इंजिन बंद करून या उतारावरून चालवीत असतात. अचानकपणे इतर वाहने समोर आल्यास चालकाचा वाहनावरील ताबा सुटतो अन् विचित्र अपघात घडतो.

महामार्गावर इतर ठिकाणीही उतार असतो. मात्र, या ठिकाणी वारंवार अपघात घडतात. याच भागात सातत्याने अपघात का घडतात व अपघात रोखण्यासाठी त्यावर कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. ‘लोकमत’शी बाेलताना संजय कदम यांनी माहिती दिली.

येथेच अपघात का हाेतात?

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल हा परिसर तीव्र उताराचा आहे. हा नैसर्गिक उतार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या दृष्टीने नियमाप्रमाणे टेकडी भागाचा उतार आहे. हा उतार साधारणत: ४.३ टक्के ग्रेडियंट आहे. बऱ्याच वेळेला काही वाहनचालक बेशिस्तपणे, वाहतूक नियमांचे पालन न करता वाहन चालवीत असल्याने सतत अपघात घडत असल्याचे मागील घटनांवरून दिसून येते, असे संजय कदम म्हणाले.

अपघात राेखण्यासाठी हे करणार

- परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेऊन महामार्गावर अधिकची सुरक्षितता करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे स्वतंत्र सल्लागार नेमण्यात आला आहे. महामार्गातही आवश्यक ते बदल करू. यात तांत्रिक समितीचा अभ्यास करून ३ टक्क्यांपर्यंत ग्रेडियंट कमी करता येईल.

उड्डाण पुलाचाही पर्याय

- मुळात हे काम बीओटी तत्त्वावर आहे. यात आम्हालाही बऱ्याच समस्या आहेत. तांत्रिक समितीचा अहवाल आल्यानंतर सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. साधारणत: तीन महिन्यांमध्ये यावर निर्णय होईल. त्यानंतर कामास सुरुवात होईल. यामध्ये उतार कमी करायचा की उड्डाणपूल करायचा, याबाबत नेमलेल्या स्वतंत्र सल्लागार, समितीच्या अहवालानंतरच ठरविण्यात येईल, असेही संजय कदम म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातsatara-acसाताराkatrajकात्रजNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण