शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

देश काँग्रेसमुक्त होणार नाही, भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेस हवी: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 9:28 AM

देशातील काही धर्मांध शक्ती काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. परंतु काँग्रेसशिवाय भारत होऊ शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : देशातील काही धर्मांध शक्ती काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. ते देशात काँग्रेसबद्दल द्वेषाची भावना पसरवण्याचे काम करत आहेत. मात्र, काँग्रेसमुक्त भारत कधीही होणार नाही. देशाला आज आणि पुढेही काँग्रेस आणि काँग्रेस विचाराची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे बुधवारी आयोजित स्नेहमेळाव्यास शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती, खासदार श्रीनिवास पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाइंसह विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. 

पवार म्हणाले, मी २४ वर्षांनंतर या वास्तूत आलो, याचा आनंद आहे. प्रत्यक्षात पुण्यात काँग्रेसची स्थापना होणार होती. मात्र, प्लेगमुळे पुण्यातील बैठक रद्द करून ती मुंबईला झाली. स्वातंत्र्यानंतर पुण्यातून प्रदेश काँग्रेसचे काम चालत होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये काँग्रेसचे मोठे योगदान आहे. 

काही जण काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा करतात; परंतु काँग्रेसशिवाय भारत होऊ शकत नाही. भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेस सोबत हवी. आजच्या सत्तेचा विचार देशात विषमतेला खतपाणी घालणारा आहे. एकत्र येऊन या शक्तीविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार