शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

"सूर्य कायमचा संपला..." जे.पी. नड्डा यांना नीलम गोऱ्हे यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 2:26 PM

देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही

पुणे : देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे केला होता. यावर विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेचे उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या, की जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा रात किड्यांना अस वाटत की सूर्य हा कायमचा संपला आहे. पण सकाळ झाल्यावर त्यांच्या ते लक्षात येत. असा टोला यावेळी गोऱ्हे यांनी जे. पी. नड्डा यांना लगावला आहे. पुण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी त्या बोलत होते.

अशा लोकांना बोलायचं अधिकार नाही

खासदार संजय राऊत यांच्या अटकेबाबत नीलम गोऱ्हे यांना विचारल असता त्या म्हणाल्या,  कुठल्याही व्यक्ती बाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना म्हणजेच तपास सुरू असताना मत व्यक्त करणे योग्य नाही. पण एक गोष्ट आहे की खासदार संजय राऊत यांनी जी मुदत मागितली होती. ती मुदत देण्यात आली नाही. अनेक वर्ष याचा तपास सुरू आहे. संजय राऊत हे सामाजिक काम तसेच पत्रकारांच्या समस्येवर काम करत असून ते याही परिस्थितीवर योग्य प्रकारे ते आपली बाजू मांडतील. ज्यांनी मृत सहित्यकांची मुंडकी कापली आहे. आणि सांस्कृतिक अतिक्रमण केलं आहे. अशा प्रकारचे लोक जेव्हा बोलायला लागतात. तेव्हा त्यांना अशा पद्धतीने बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. एखाद्या झाडावर जसे बानगुडे असतात तसे या घटनेवर काही लोक बोलत आहे अशी टीका यावेळी गोऱ्हे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत बाबत अजूनही प्रतिक्रिया दिली नाही यावर गोऱ्हे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या,  याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयीन तपास सुरू असताना अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मला एक वाटत आहे की ईडी, सीबीआय अशा संस्थाचा जर कालमर्यादेत निकाल लागला तर लोकांनाही कळेल अस देखील यावेळी गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाNeelam gorheनीलम गो-हेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण