शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

ना हिंदुंची ना मुस्लिमांची, राज्यकर्त्यांना फक्त सत्तेची चिंता; अरविंद सावंतांची सरकारवर टीका

By राजू इनामदार | Updated: January 30, 2025 18:16 IST

देशात शेतकऱ्यांना हमीभाव, कोसळणारा रुपया, बेरोजगारी असे कितीतरी प्रश्न आहेत, यावरून लक्ष वळवायचे तर हिंदु मुस्लिम करायचे असंच ते करतात

पुणे: केंद्र सरकारमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांना देशातील हिंदुची किंवा मुस्लिमांचीही चिंता नाही, तर त्यांना फक्त सत्ता कशी राहील याचीच चिंता आहे अशी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. सत्तेसाठी ते संविधानही बदलतील असे सांगत ते सोयीने सगळे नियम बदलत चालले आहेत असे सावंत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बालगंधर्व कलादालनातील व्यंगचित्र प्रदर्शनाला सावंत यांनी गुरूवारी दुपारी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकार सगळे नियम बदलत चालले आहे. निवडणूक आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान विरोधी पक्षनेते व सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश करतील असा नियम होता. त्यांनी सरन्यायाधिशांना काढून टाकले. तिथे पंतप्रधान सुचवतील ते मंत्री असा बदल केला. आता आयुक्तांची निवड कायमच दोन विरूद्ध एक अशा मतांनी होईल.

वक्फ बोर्डाचा तब्बल ६९५ पानांचा अहवाल त्यांनी सायंकाळी सव्वासहा वाजता पाठवला. त्यातच दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता बोर्डाची बैठक आहे, त्यात तुमचे म्हणणे मांडा असे कळवण्यात आले. ६०५ पानांचा अहवाल वाचणार कधी व त्यावर म्हणणे तयार करणार कधी? पण याचा विचार ते करत नाहीत. सगळे आधीच ठरलेले असते, त्याप्रमाणेच त्यांना करायचे असते. बोर्डमध्ये बहुमताने ज्या सुधारणा झाल्या, त्या अशा करण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने त्यांचे काम सुरू आहे असे सावंत म्हणाले.

देशात हिंदु विरूद्ध मुस्लिम कसे होईल हेच ते पहात असतात असा आरोप सावंत यांनी केला. देशात शेतकऱ्यांना हमीभाव, कोसळणारा रुपया, बेरोजगारी असे कितीतरी प्रश्न आहेत, मात्र त्यावरून लक्ष वळवायचे तर हिंदु मुस्लिम करायचे असे ते करतात. याचा अर्थ त्यांना हिंदुंची किंवा मुस्लिमांची काळजी आहे असा नाही तर सत्ता कशी टिकवता येईल याची चिंता आहे. त्यांचे जे काही सुरू असते ते सगळे सत्ता कशी मिळेल यासाठीच अशी टीका सावंत यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेArvind Sawantअरविंद सावंतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCentral Governmentकेंद्र सरकारHinduहिंदूMuslimमुस्लीमShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती