शहरं
Join us  
Trending Stories
1
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
2
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
3
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
4
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
5
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
6
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
7
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
8
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
9
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
10
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
12
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
13
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
14
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
15
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
16
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
17
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
18
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
19
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
20
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ

लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दी वर्षात महाराष्ट्र-बंगाल मैत्रीचा नवा अध्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 18:39 IST

दोन्ही राज्यातील कवी, नेते,लेखक, आणि कलाकार यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसरहद संस्थेचा पुढाकार : मराठी, बंगाली भाषेतील ५० पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : स्वातंत्र्यलढ्यात पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. लाल (लाला लाजपत राय), बाल (लोकमान्य बाळ गंगाधर टिळक) आणि पाल (बिपिन चंद्र पाल) यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इतिहास घडवला. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र-पंजाब संबंध अधिक दृढ झाले असले तरी महाराष्ट्र-बंगाल संबंध अधिक विकसित होऊ शकलेले नाहीत. हे संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी सरहद संस्थेने पुढाकार घेतला आहे. लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीनिमित्त महाराष्ट्र-बंगाल मैत्रीचा नवीन अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरहदचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार म्हणाले, 'भाषा, साहित्य, कला, नाट्य, चित्रपट, शिक्षण, संस्कृती या क्षेत्रातील मान्यवरांच्या वैयक्तिक लोक-लोक संपर्कांवर या वर्षी भर दिला जाणार आहे.  दोनही राज्यांत विविध कार्यक्रम आयोजित करून लोक चळवळ सुरू केली जाईल. त्यासाठी दोन्ही राज्यातील लेखक, कवी, नेते आणि कलाकार यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. आम्ही पंजाबी, बंगाली आणि मराठी भाषेतून सुमारे ५० पुस्तकांचे भाषांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.'

…..............

ममता बॅनर्जी, कॅप्टन अमरिंदरसिंग, उद्धव ठाकरे या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांचे उद्घाटन १ ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह लाला लाजपत राय, लोकमान्य टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांचे वंशज अनुक्रमे अ‍ॅड. अनिल अग्रवाल, शैलेश आणि डॉ. दीपक टिळक आणि दीप पाल यांची उपस्थिती असणार आहे. या काळात तीन स्वातंत्र्यसैनिकांचे वंशजही विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. १ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम सुरू होईल आणि योगी श्री अरबिंदो घोष यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 15 ऑगस्ट २०२२ पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. 

टॅग्स :PuneपुणेSarhadसरहद संस्थाwest bengalपश्चिम बंगालMaharashtraमहाराष्ट्रliteratureसाहित्य