शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
4
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
5
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
7
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
8
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
9
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
10
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
11
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
12
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
13
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
14
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
15
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
16
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
17
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
18
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
19
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
20
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध

Nitesh Rane: ताईंनी वाट पहावी ,दिवस मोजावे ,आकाशाकडे पाहत बसावे; राणेंचा सुप्रिया सुळेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:43 IST

हे काय महाविकास आघाडीचे सरकार आहे काय? मंत्री सक्षम आहेत, मोठे मताधिक्य आम्हाला आहे

पुणे: शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही, असा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. या विधानावर आमदार नितेश राणेंनी टोला लगावला आहे. हे काय महाविकास आघाडीचे सरकार आहे काय? मंत्री सक्षम आहेत. मोठे मताधिक्य आहे. ताईंनी वाट पाहत बसावे ,दिवस मोजावे ,आकाशाकडे पाहत बसावे असा टोला राणे यांनी लगावला. शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने  तिथीप्रमाणे साजरा करण्यात येणाऱ्या शिवजयंती महोत्सवात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

राणे म्हणाले. महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर नको ही हिंदू समाजाची भावना आहे. ती आठवण आम्हाला नको. महाराष्ट्रात प्रत्येक जण अस्वस्थ आहे. औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल करून त्यांना संपविले. त्याची कबर आपल्याकडे कशाला? काही लोकांना ती आठवण म्हणून वाटते ,पण आम्हाला हिंदू समाज म्हणून ती नको आहे. आम्हाला अशी कुठलेही  चिन्ह नको जे स्वराज्याच्या विरोधात उभे राहिले. कोणाला ती पाहिजे असल्यास त्यांनी पाकिस्तान बांगलादेशात घेऊन  जावे. बजरंगदल, विश्वहिंदू परीषद यासंदर्भात राज्यभर आंदोलन करत आहेत. हिंदू समाजाची भावना आहे की औरंगजेबाची कबर नको. ही भावना प्रत्येकाला कळाली पाहिजे म्हणून राज्यभर आंदोलन होत आहेत याकडे शासनाचे बारीक लक्ष आहे.                                

फोन उचलल्यावर त्यांनी जय शिवराय म्हणू नये 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांनी फोनवर बोलताना जय शिवराय बोलावे अशी मोहीम सुरू केली आहे यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, त्यांनी फोन उचलल्यावर अल्ला हू अकबर असे म्हणावे. जो पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांनी फोन उचलल्यावर जय शिवराय म्हणू नये. त्यांनी फोन उचलल्यावर अल्ला हु अकबर म्हणावे म्हणजे लोकांना कळेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा कार्यकर्ता बोलत आहे अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNitesh Raneनीतेश राणे PoliticsराजकारणBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती