शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दुर्दशेला पाकिस्तानच जबाबदार, दहशतवादाला आश्रय दिला तर दुसरं काय होणार?, जयशंकर यांनी सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 08:36 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या आजच्या दुर्दशेला स्वत: पाकिस्तानच जबाबदार असल्याचं जयशंकर म्हणाले.

पुणे-

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या आजच्या दुर्दशेला स्वत: पाकिस्तानच जबाबदार असल्याचं जयशंकर म्हणाले. दहशतवाद्यांना आश्रय दिला गेला तर आणखी काय होणार? असंही ते पुढे म्हणाले. पुण्यात परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. 

"ज्या देशाचा मूळ उद्योग दहशतवाद हा असेल तो देश कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही आणि कधीच समृद्ध शक्ती म्हणून उदयास येऊ शकत नाही", असं एस. जयशंकर म्हणाले. 

दहशतवाद हाच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या संबंधांचा मूलभूत मुद्दा आहे. ज्याला अजिबात नाकारता येऊ शकत नाही आणि आपण मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असंही ते म्हणाले. पाकिस्तानचं नाव न घेता जयशंकर म्हणाले की, प्रत्येक देशानं आपल्या आर्थिक अडचणींवर तोडगा काढणं गरजेचं असतं. तसंच आपल्या राजकीय आणि सामाजिक मुद्दयांचीही अडचण सोडवायची असते. पाकिस्तानला आर्थिक मदत करण्याबाबतच्या मुद्द्यावर जयशंकर यांनी कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी देशातील स्थानिक भावनांचा विचार करणं गरजेचं आहे असं म्हटलं. 

पाकिस्तानचा मूळ उद्योग दहशतवादजेव्हा एखादा देश गंभीर आर्थिक संकटात असतो तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी धोरणात्मक पर्याय शोधावे लागतात. यातूनच एखाद्या देशाला आपले आर्थिक मुद्दे सोडवावे लागतात. तसंच देशाला आपल्या राजकीय मुद्द्यांनाही सांभाळावं लागतं. जर एखाद्या देशाचा मूळ उद्योग दहशतवाद असेल तर कोणताही देश कधीही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही आणि समृद्ध होऊ शकत नाही, असं जयशंकर म्हणाले. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर