शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

'अशा कितीही शक्ती एकत्र आल्या तरी काही होणार नाही...' बच्चू कडूंची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 2:20 PM

किती ही शक्ती एकत्र आल्या तरी जन शक्तीसाठी तुम्ही काय केलं? बच्चू कडूंचा सवाल

पुणे: शिवशक्ती-भीमशक्ती आणि लहूशक्ती ही एकाच शक्तीची रूपे आहेत. या तिन्ही शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्रात नव्हे, तर देशात एक प्रचंड ताकद निर्माण होईल. म्हणूनच शिवशक्ती-भीमशक्ती व लहूशक्तीचा लवकरच मेळावा घेणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावरून आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. लोकांबाबत जर मनात आस्था नसेल अशा कितीही शक्ती एकत्र येऊन काय होणार नाही असं ते यावेळी म्हणाले आहेत. पुण्यात अर्हम फौंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने 'संवाद- स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. 

बच्चू कडू म्हणाले, किती ही शक्ती एकत्र आल्या तरी जन शक्तीसाठी तुम्ही काय केलं? दिव्यांगांसाठी आम्ही दहा वेळा गेलो, एकदा ही मीटिंग झाली नाही. लोकांबाबत जर मनात आस्था नसेल अश्या शक्ती एकत्र येऊन काय होणार नाही. मंत्री मंडळ विस्तार हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. दिव्यांग मंत्रालयासमोर विस्तार ही लहान गोष्ट आहे. आता हे वंचितांचा विस्तार झाला पाहिजे. विस्तार कधी होणार हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना विचारलं पाहिजे.

 भाजपमध्ये छत्रपतींचा अपमान करण्याची स्पर्धा लागलीय...

संजय राऊत यांचं म्हणणं काही अंशी खरच आहे. मी त्यांच्या बाजूने आहे. काही लोक बोलतात, कुठल्याही महापुरुषांबद्दल बोलणे उचित नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. सगळ्याच गोष्टीवर कारवाईची गरज नसते. जे बोलतात त्यांना हे समजल पाहिजे. स्वतः ची नाहीतर जनाची तर असली पाहिजे. राज्यपालांनी यावर स्पष्टीकरण देणे महत्वाचं आहे. सगळे प्रश्न कारवाईने सुटत नाही.

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे