शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

राजकीय नेत्यांनी साहित्यिकांचा कितीही सत्कार केला, तरी तुम्ही कधीच सत्य मांडायचे थांबवू नका - माधव कौशिक

By श्रीकिशन काळे | Published: May 26, 2024 3:58 PM

साहित्यिकांनी सर्जनशीलतेची देणगी या शक्तीचा प्रामाणिकपणे वापर करून लिहायला हवे

पुणे: ‘देशात जेव्हा सामान्य व्यक्तींवर अन्याय होतो, तेव्हा लेखणीद्वारे साहित्यिकांना त्याविरोधात आवाज उठवायचा असतो. कारण ईश्वराने तुम्हाला सर्जनशीलतेची देणगी, एक शक्ती दिलेली आहे. ती तुम्ही प्रामाणिकपणे वापरून लिहिले पाहिजे. साहित्यिकांनीमन की बात’ केली पाहिजे, असे आवाहन साहित्य अकादमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक माधव कौशिक यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, मसापचे विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह अंजली कुलकर्णी उपस्थित होते.

कौशिक म्हणाले, राजकीय सत्ता आणि साहित्यिक कधीच एकत्र चालू शकत नाहीत. कारण राजकीय सत्ता चुकली आणि त्यांनी सामान्य लोकांवर अन्याय केला, तर साहित्यिकच तो अन्याय लेखणीद्वारे मांडू शकतात. राजकीय नेत्यांनी साहित्यिकांचा कितीही सत्कार केला, तरी तुम्ही कधीच सत्य मांडायचे थांबवू नका, असा सल्ला कौशिक यांनी दिला.

‘लोकमत’च्या संपादकांचा गौरव

विशेष ग्रंथकार पारितोषिकांमध्ये दैनिक ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांचाही समावेश होता. त्यांना आशा संत पारितोषिक प्रदान करून गौरव करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेJournalistपत्रकारliteratureसाहित्यEducationशिक्षणPoliticsराजकारणMan ki Baatमन की बात