शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

"...आता महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे", बारामतीत शरद पवारांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 09:33 IST

वडगांव निंबाळकर (ता. बारामती) येथे जनसंवाद दाैऱ्याच्या वेळी आयोजित सभेत पवार बोलत होते...

बारामती (पुणे) : काही लोक त्यांच्याकडे असणाऱ्या सत्तेचा गैरवापर करतात. सत्तेचा वापर करुन लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत. लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवावी लागेल. त्यासाठी येणारी निवडणुक आहे. लोकसभेत तुम्ही चांगले काम केले. आता काही झालं तरी महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे. शेतकरी, मजुर, कामगांरांसह प्रत्येक घटकासाठी सत्तेचा वापर करायचा आहे. तुमचे प्रश्न सोडवून योग्य दिवस येतील अशी काळजी घेतली जाईल, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

वडगांव निंबाळकर (ता. बारामती) येथे जनसंवाद दाैऱ्याच्या वेळी आयोजित सभेत पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या ऊस गाळपासह, ऊस दर, साखर वीज, इथेनाॅलच्या दराबाबत सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने साखरधंदा अडचणीत आला. संस्थाचालकांना माझी विनंती आहे, बाबांनो इतके वर्ष तुम्ही आमचे आशीर्वाद घेतले.आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या भल्यासाठी पाठिंबा दिला. मात्र, या सगळ्यांच्या भल्याची तुम्हाला आठवण नसेल तर तुमच्यासाठी काय करायचे याचा निकाल आम्हाला घ्यावा लागेल, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह साखर कारखाना पदाधिकाऱ्यांचे नाव न घेता इशारा दिला.

पवार पुढे म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणुक वेगळी होती, ती सोपी नव्हती. देशात आणि परदेशात देखील या निवडणुकीची चर्चा झाली. राज्याची सत्ता दुसऱ्यांच्या हातात आहे, काही लोकांना दमदाटीचे प्रकार घडले. सगळ्या देशात इथ काय होईल, याची शंका होती. आमचे पदाधिकारी गावोगाव जात असत. पहिली निवडणूक यावेळी गावात पुढे कोणी येत नव्हते, सर्वजण शांत होते. न बोलणारी यंदा निवडणूक झाली. त्यामुळे अनेकांना या ठिकाणी काय होईल, याची काळजी होती. मात्र मला खात्री होती नेमके तेच घडले. जे लोक पुढे येत नव्हते, शांत होते. त्यांना कोणते बटण दाबायचे हे सांगावे लागले नाही. मतमोजणी झाल्यावर हे स्पष्ट झाले. त्यामुळे आम्हाला आता लोकांच्या कामावर अधिक लक्ष द्यावे लागेल, असे पवार म्हणाले.

आज राज्यात वेगळ्या लाेकांची सत्ता आहे. मोदीसाहेब देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी सबंध देशात वेगळा विचार दाखवायचा प्रयत्न  केला. त्यांच्यासमोर कोणी टिकणार नाही, असे लोकांना वाटले. राज्यात त्यांनी १६ ठिकाणी सभा घेतल्या. माझे भाग्य प्रत्येक ठिकाणी त्यांनी माझे नाव घेत टीका केली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. ज्या बारामतीची शंका होती, त्याठिकाणी ४० हजारांपेक्षा अधिक मते मिळाली. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, सत्तेचा गैरवाप करणारे असो, वेगळे भाष्य करणारे असो, फोन करुन धमकी दिलेली असो, सगळ्यांनी याची नोंद न घेता योग्य ठिकाणी मतदान करीत मतांचा विक्रम केल्याचे पवार म्हणाले. यावेळी युगेंद्र पवार, सदाशिव सातव, अॅड एस. एन जगताप, सतीश खाेमणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

‘साहेबां’ची आतापासूनच बारामतीत तळ ठोकण्यास सुरुवात-

बारामती विधानसभा निवडणूक शरद पवार यांनी गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी आतापासूनच बारामती शहर आणि तालुका पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. पवार यांनी घातलेले लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिंता वाढवणारे आहे. मागील आठवड्यापासूनच शरद पवार यांनी बारामतीत विशेष लक्ष घातले आहे. त्यांनी डाॅक्टर, व्यापारी, वकील आदी मेळावे घेत दुष्काळी दाैरे केले. त्यापाठोपाठ दुसऱ्याच आठवड्यात तीन दिवसांच्या दाैऱ्यांवर पवार आले आहेत. आज पहिल्याच दिवशी त्यांनी युगेंद्र पवार यांना बरोबर घेत निंबुत, वडगांव निंबाळकर, कोर्हाळे, करंजे पुल, माळेगांव येथे जनसंवाद दाैरे आयोजित करीत संवाद साधला. १९ जुन रोजी पवार यांचे सकाळपासून सायंकाळपर्यंत सांगवी, खांडज, निरावागज, डोर्लेवाडी, काटेवाडी, पिंपळी येथे शेतकरी, ग्रामस्थ यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत. तर गुरुवारी (दि. २०) रोजी ते पणदरे, लाटे, लोणीभापकर, मोरगाव येथे शेतकरी संवाद साधणार आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड