शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

निवडणूक स्थगित झालेल्या संस्थांची संख्या ६५ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोनामुळे राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या राज्यातील सहकारी संस्थांची संख्या आता ६५ हजार इतकी झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोनामुळे राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या राज्यातील सहकारी संस्थांची संख्या आता ६५ हजार इतकी झाली आहे. इतक्या सर्व संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार असल्याने त्याचा राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणावर ताण येणार आहे.

सरकारने ५ वेळा कोरोनाच्या कारणावरून या निवडणुकांना स्थगिती दिली. यातील बहुसंख्य संस्था सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्यांचे सभासद २५० पेक्षा जास्त आहेत. प्रत्येक ५ वर्षांनी त्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांची संचालक मंडळातून निवड होते. सहकारी संस्था निवडणूक कायदा त्यासाठी तयार केला आहे. त्याचे नियम पाळून संचालक मंडळाला कामकाज करावे लागते.

संचालक मंडळाची ५ वर्षांची मुदत संपली की निवडणूक प्राधिकरण नव्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करत असते. निवडणूक अधिकारी निश्चित करण्यापासून ते मतदार यादीपर्यंत व प्रत्यक्ष मतदान घेऊन निकाल जाहीर करेपर्यंतचे काम प्राधिकरणाला करावे लागतात.

आता ६५ हजार संस्थांची निवडणूक घ्यायची तर त्यासाठी प्राधिकरणाला स्वतंत्र नियोजन करावे लागणार आहे. सरकारी अधिकारी नियुक्ती, मतदार याद्या या सर्व प्रक्रियेचा ताण त्यांच्यावर येणार असून त्याचे नियोजन कसे करायचे या चिंतेत प्राधिकरण प्रशासन आहे. इतके सरकारी अधिकारी, कर्मचारी कसे उपस्थित करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

याशिवाय प्रत्येक संस्थेतील अनेक सभासद संचालक मंडळाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतात. पॅनेल वगैरे करून, सभासदांमध्ये प्रचार करत ही निवडणूक लढवली जाते. निवडणूकीला वारंवार स्थगिती मिळत असल्याने या इच्छुक सभासदांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यातून विद्यमान संचालक मंडळावर भ्रष्टाचारासारखे आरोपही केले जात आहेत. राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होतात, तर मग सहकारी संस्थांच्या साध्या निवडणूकांना सरकार का सातत्याने स्थगिती देत आहे असा त्यांचा प्रश्न आहे.

------------

मुदत संपलेल्या संस्थांची संख्या वाढतच जाणार आहे, मात्र नियोजन करून या निवडणुका घेण्यात येतील. जानेवारीपासून निवडणूका होणार होत्या. त्यासाठी संस्थांचे चार वर्ग करून त्याप्रमाणे कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता. अधिकारी नियुक्त करण्यात आले होते, मात्र आता पुन्हा ३१ मार्चपर्यंत स्थागिती मिळाल्याने कार्यक्रम स्थगित ठेवला आहे.

- यशवंत गिरी- सचिव, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण