शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रिक्त जागांचा आकडा १५ हजारांवर जाणार

By admin | Published: June 29, 2015 6:52 AM

अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून सुमारे १३ हजार विद्यार्थी बाहेर पडल्याने यंदा रिक्त जागांचा आकडा १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

पुणे : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून सुमारे १३ हजार विद्यार्थी बाहेर पडल्याने यंदा रिक्त जागांचा आकडा १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय प्रक्रिया संपल्यानंतरही काही कारणास्तव प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना सहजरीत्या प्रवेश मिळणार आहे. तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थीही नंतर प्रवेश रद्द करतात. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा वाढू शकतो.केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या आॅनलाईन प्रवेश प्रकियेमध्ये सुमारे ७२ हजार प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी सुमारे ६८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण व त्यांनी दिलेल्या पसंती क्रमानुसार समितीतर्फे पहिली गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली. या यादीत सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांना स्थान मिळाले. त्यानुसार गुरुवार ते शनिवार असे तीन दिवस प्रवेशाची पहिली फेरी घेण्यात आली. या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य होते. मात्र, सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.सुमारे ७२ हजार जागांसाठी ६८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यामुळे सुमारे ४ हजार जागा रिक्त राहणार हे स्पष्ट झाले होते. मात्र, पहिल्या फेरीत स्थान मिळूनही १३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता प्रक्रियेतून बाहेर पडणे पसंत केले आहे.