शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

पाणलोट क्षेत्रातील जुन्या आठवणींना उजाळा, जुनी मंदिरे दिसू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:09 AM

भोर तालुक्यातील भोरपासून १८ किमीवर वेळवंडी नदीवर ब्रिटिशकालीन भाटघर धरण बांधण्यात आले. त्यावेळी ४० गावांतील ५ हजार ६७१ एकर ...

भोर तालुक्यातील भोरपासून १८ किमीवर वेळवंडी नदीवर ब्रिटिशकालीन भाटघर धरण बांधण्यात आले. त्यावेळी ४० गावांतील ५ हजार ६७१ एकर जमीन संपादित करण्यात आली, त्यावेळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावे उठवून स्थलांतरित झाली आहेत. स्थलांतरित झालीतरी जुन्या आठवणी तशाच राहिल्या आहेत. परंतु या गावाच्या वेशी, घरे, जुन्या वड्यांच्या खुणा, मंदिरे आजही आपल्याला या धरण क्षेत्रात पाणी कमी झाल्यावर पाहवयास मिळतात.

भाटघर पाणलोट क्षेत्रात जुन्या वेळवंड गावठाणातील पांडवकालीन नागोबाचे मंदिर गेले दहा महिने पाण्यामध्ये असते पाणी कमी झाल्यामुळे मंदिर पाहण्यास मिळत आहे. मंदिराचा गाभारा व मंदिराच्या भिंतीचे बांधकाम दगडात केलेले आहे. मंदिराच्या कळसाचे बांधकाम चुनखडक व वाळूमध्ये केलेले आहे. मंदिरासमोर पार्वतीमातेची मूर्ती व नंदी आहे. या भागात पाऊस जास्त असल्याने दरवर्षी पावसामुळे धरणातील गाळ व पाणी गाभाऱ्यामध्ये साचून राहते. वेळवंड गावातील ग्रामस्थ व तरुण मुले गाभऱ्यातील गाळ काढून मंदिराची स्वच्छता करतात. पांडवकालीन पौराणिक मंदिर पाहण्यासाठी परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात. हा प्राचीन काळातील सांस्कृतीक वारसा जतन करण्याची काळाची गरज वेळवंड परिसरातील ग्रामस्थ करीत आहे.

भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी कमी झाल्यावर आपल्या गावदेवाचे दर्शन मिळते.

छाया - स्वप्निलकुमार पैलवान