शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

वानवडीत इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू; चार मजूर गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 11:27 PM

स्लॅब कोसळून दुर्घटना; एका मजुराचा मृत्यू; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

वानवडी : वानवडीतील विकासनगर भागात  इमारतीच्या स्लँबचा भरणा सुरु असताना स्लँबचा काही भाग कोसळला. यामध्ये चार मजूर गंभीर जखमी झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राम नरेश पटेल (वय ४०, मुळगाव मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या मजूराचे नाव आहे व शत्रशिंग धूभखेती (वय ३५), बरशिंग पट्टा (वय ३७), संदिप कुमार उलके (वय १८), दिपचंद मराबी (वय २७, रा. मध्यप्रदेश) हे मजूर जखमी झाले आहेत.        मिळालेल्या महितीनुसार, बाबजी इन्फ्रा एलएलपी या कंन्ट्रक्शन कंपनीकडून इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. इमारतीच्या दुसऱ्या टप्प्यातील स्लॅबचा भरणा सुरु होता. त्यामधील जवळपास ६०० चौ.फुट स्लॅब भरणा करत असताना कोसळला. ३० फुट उंचीवर स्लॅब भरण्याचे काम सुरु होते त्यामुळे स्लॅबचा ढाचा तयार करताना वापरण्यात आलेल्या लोखंडी पाईपच्या टेकूचा आधार निकृष्ट दर्जाचा असल्याने स्लॅब कोसळला असल्याचे बोलले जात आहे.         घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाची गाडी, देवदूत घटनास्थळी दाखल झाले यामध्ये मध्यवर्ती अग्निशमन केंद्र प्रमुख प्रकाश गोरे, देवदूत वाहन चालक मनोज गायकवाड, फायरमन सुरज तारु , हर्षद येवले, सुभाष खाडे, अनिमिष कोंडगेकर, निलेश वानखेडे व मदतनीस संतोष माने यांनी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच वानवडीतील क्विक रिस्पॉन्स टिमने जखमी मजूरांना खाजगी रुग्णालयात नेण्यात नेले.           घटनास्थळी वानवडी रामटेकडीचे सहा. आयुक्त शाम तारु, वानवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड, गुन्हे विभाग पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर तसेच वानवडी बाजार पोलीस चौकीच्या पोलीस उपनिरीक्षक सोनालीका साठे घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्यात आला व पुढील तपास सुरु असल्याचे वानवडी पोलिसांकडून सांगण्यात आले.  दीड वर्षापूर्वी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून काही कारणास्तव इमारतीचे बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले गेले होते. त्यानंतर इमारत बांधकाम करणाऱ्यांकडून या आदेशाला चँलेज देत प्रकरण न्यायालयात नेले होते. महिन्याभरापूर्वीच न्यायालयातून पालिकेने दिलेल्या आदेशावरुन स्थगिती उठवण्याबाबत निर्णय देण्यात आला होता. परंतु महानगरपालिकेला बांधकाम सुरु करण्याबाबतची कोणतीही पूर्वसूचना न देता न्यायालयाच्या निकालानुसार काम सुरु केल्याचे पालिका बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

सोईस्कर रस्ता नसताना बांधकामाला परवानगी कशी? स्थानिकांचा आक्रोशइमारतीचे बांधकाम होत असलेल्या जागेवर जाण्यास सोयीस्कर रस्ता नसताना बांधकामाला परवानगी कशी दिली? असा आक्रोश इमारती शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी व्यक्त केला आहे. कारण राज्य राखीव पोलीस दलाकडून त्यांचा खाजगी वापराचा रस्ता असल्याचे सांगत दिड वर्षापुर्वीच विकासनगरमधील रस्ता गेट लावून बंद करण्यात आला होता आणी रहिवाशांच्या व बांधकाम होत असलेल्या इमारती कडे जणारा वहिवाटीचा रस्ता फक्त पायवाट ठेवून भिंत बांधून बंद करण्यात आला होता. त्यामुळे पायवाटीऐवढ्या जागेतून जखमींना घेऊन जाण्यास अडथळा आला व रुग्णालयात उशिरा पोचल्याने एकाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता येथील संतप्त नागरीकांनी वर्तविली.