शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
7
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
8
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
9
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
10
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
11
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
13
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
14
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
15
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
16
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
17
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
18
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
19
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
20
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...

नाटक पाहायला या, अशी भीक मागावी लागते; ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम करंडक पारितोषिक प्रदान सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 11:57 IST

खरं तर खऱ्या प्रश्नांवर मराठी माणसाला नाटक बघायचे नाही, मराठी प्रेक्षक ‘डल्ल’ झालाय

पुणे: ‘कोरोनानंतर मराठी नाटक संपलेले आहे. नवरा-बायकोचे भांडण आणि रहस्यमय नाटक असेच प्रकार उरलेत. खरं तर खऱ्या प्रश्नांवर मराठी माणसाला नाटक बघायचे नाहीय. मराठी प्रेक्षक ‘डल्ल’ झालाय. आता प्रायोगिक नाटकही खर्चिक झाले. नाटक हे आपल्या जगण्याशी संबंधित काहीतरी आहे, अशी भावना असलेले मराठी लोक खूपच कमी आहेत. आज मोठी लोकंही घरोघरी फोन करून नाटक पाहायला या, अशी भीक मागून प्रयोग करताहेत,’ अशी व्यथा ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ५९व्या आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत म. ए. सो. गरवारे कॉलेजने सादर केलेल्या ‘बस नं. १५३२’ एकांकिकेने पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेचे पारितोषिक प्रदान सोहळा ज्येष्ठ नाटककार देशपांडे यांच्या हस्ते शनिवारी (दि. २८) भरत नाट्यमंदिरमध्ये झाला. याप्रसंगी परीक्षक गिरीश परदेशी, गोपाळ जोशी, मानसी जोशी, आदी उपस्थित होते. स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक आणि ३००१ रुपयांचे रोख पारितोषिक विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामतीच्या ‘पाटी’ एकांकिकेने, तर सांघिक तृतीय पारितोषिक संजीव करंडक आणि २००१ रुपयांचे पारितोषिक न्यू आर्टस् ॲन्ड सायन्स कॉलेज, अहमदनगरच्या ‘देखावा’ या एकांकिकेला प्रदान करण्यात आला.

देशपांडे म्हणाले, नाटकाकडे सीरिअसली पाहणारे लोक कमी होत आहेत. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल आणि दुसरीकडे भाषा खल्लास होईल; पण भाषा मरणार नाही. ती जिवंत राहील. जगात भाषेचा दहावा-बारावा नंबर राहील; परंतु, त्या भाषेतून जे सांस्कृतिक घडणं आहे ते खल्लास होत जाईल. आपण सर्व गोष्टीत ‘डल्ल’ झालो आहोत. रोज सीरिअल बघून रात्री झोपून टाकायचं, असं जर केलं तर अवघड आहे. आज नाटकाकडे करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते. जगणं समजून घेण्याची प्रक्रिया आहे, ती नाटकात असते. कला ही आपल्या जगण्याचा भाग आहे. नाटकातून ते समजून घेण्याचा विचार करणारे लोक कमी झाली आहेत. भाषा मेली काय, संस्कृती मेली काय, याकडे कोणाचेच लक्ष नाही.’

आपल्याकडे बुद्धिप्रामाण्यवादाचे स्तोम खूप माजवले. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बुद्धिप्रामाण्यवाद ओके आहे; पण माणसाच्या जगण्यात ती काय करते? तर माणसाच्या प्रत्येक संबंधामध्ये बुद्धीमुळे समस्या निर्माण होतात. त्या बुद्धी सोडवू शकत नाही. बुद्धी ही अपयशी चीज आहे, मानवी आयुष्यातील ! चर्चेने प्रश्न सोडवू ! पण कुठं सुटतात ! माझी नाटकं वैचारिक असतात, असं बोलतात; पण ते यासाठी असतात की, विचार हे अपयशी आहेत. - चं. प्र. देशपांडे, ज्येष्ठ नाटककार

टॅग्स :Puneपुणेartकलाcollegeमहाविद्यालयEducationशिक्षणcultureसांस्कृतिकSocialसामाजिक