शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

साखर उताऱ्यात एक टक्का घट; सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन

By नितीन चौधरी | Updated: December 7, 2023 16:02 IST

गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

पुणे : राज्यात एक नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या साखर हंगामाला सव्वा महिन्यांचा काळ उलटला असून १८० कारखान्यांनी आतापर्यंत १६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा साखर उताऱ्यात सुमारे एक टक्क्याची घट झाली आहे. गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात एक नोव्हेंबरला ऊस गाळप सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र, त्यानंतर दिवाळी आल्याने प्रत्यक्षात गाळपास उशिरा सुरुवात झाली. त्यातही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे साखर कारखाने सुरू होण्यास विलंब झाला. राज्यात सध्या ८८ सहकारी व ९२ खाजगी असे एकूण १८० साखर कारखाने ऊसगाळप करत आहेत. कोल्हापूर विभागामध्ये २१ सहकारी व ११ खासगी असे एकूण ३२ कारखाने तर पुणे विभागात १६ सहकारी व ११ खाजगी असे २७ कारखाने ऊसगाळप करत आहेत. सोलापूरमध्ये सहकारी १५ व खाजगी २९ असे ४४ कारखाने, नगर विभागात १४ सहकारी व १० खासगी असे २४, औरंगाबाद विभागामध्ये १३ सहकारी ९ खासगी असे ११, नांदेड विभागात ९ सहकारी व १९ खासगी असे २८ तर अमरावती दोन तर नागपुरात एक खासगी कारखाना गाळप हंगामात सहभागी झाला आहे.

आतापर्यंत २०२.४४ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून १६.३५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. सर्वाधिक साखर उत्पादन पुणे जिल्ह्यात ३.९ लाख टन तर सोलापूर विभागात ३.०४ लाख टन उत्पादन झाले आहे. कोल्हापूर विभागात ३.२, नगर विभागात २.२ लाख टन उत्पादन झाले आहे. यंदाच्या उसगाळप हंगामात पहिल्या सव्वा महिन्यात आतापर्यंत केवळ ८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. गेल्या वर्षी हाच साखर उतारा ८.८७ टक्के इतका होता. राज्यात सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागात ८.९५ टक्के मिळाला आहे. अमरावती विभागात केवळ दोन खासगी कारखाने सुरू असले तरी तेथे साखर उतारा ८.४९ टक्के आल्याचे साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पुणे विभागात ८.३३, सोलापूर विभागात ७.३९ नगर विभागात ७.९६, नांदेड विभागात ८.१२, तर औरंगाबाद विभागात सर्वात कमी ६.८३ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

पावसाने ओढ दिल्याने ऊस वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच साखर उतारा कमी मिळाल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. याचा परिणाम लागवडीवरदेखील झाला असून गाळप हंगाम यंदा आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील, अशी शक्यताही कारखानदार व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी याच काळात राज्यात १९२ साखर कारखाने सुरू होते. त्यातून २७८ लाख टन उसाचे गाळ होऊन २४ लाख टन साखर उत्पादित झाली होती.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसSocialसामाजिक