शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कांदा ६ ते ९ रुपये किलो

By admin | Published: March 13, 2016 1:37 AM

एकेकाळी गगनाला भाव भिडल्याने ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या कांदा ६ ते ७ रुपये किलोने विकला जात असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे़

चाकण : एकेकाळी गगनाला भाव भिडल्याने ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या कांदा ६ ते ७ रुपये किलोने विकला जात असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे़ चाकण मार्केट यार्डात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आवक वाढल्याने कांदा जनावरांच्या बाजारात ठेवावा लागतोे. चाकण बाजारात शनिवारी १९ हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटल ६०० ते ९०० रुपये भाव असल्याने शेतकरीवर्गात मोठी नाराजी आहे. चाकण परिसरात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेत आहेत. या वर्षी चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; मात्र त्यांची निराशा झाली़यंदा लागवडीसाठी रोपांचा तुटवडा होता़ चाकण परिसरातील शेतकऱ्यांनी कांदारोपे तयार करून व महागडी रोपे घेऊन कांदालागवड केली. आठ ते नऊ रुपये किलो दराने भाव मिळत असल्याने उत्पादनखर्चही निघत नाही, अशी खंत कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मजुरी खर्चही परवडत नसल्याने हमीभाव मिळावा, अशी मागणी य्जेजेराम टेमगिरे, वसंत तनपुरे, बाळासाहेब काळडोके, भरत हुंडारे, रघुनाथ टेमगिरे, सुदाम सावंत, रोहिदास गोपाळे, संभाजी पाचपुते यांनी केली आहे.कांदापिकाला लागवड, मजुरी, बियाणे, खते, औषधे, काढणी यासाठी एकरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. परंतु, भाव गडगडल्याने एकरी २५ ते ३० हजार रुपये मिळत असून, शेतकऱ्यांना एकरी ५ ते १० हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे. हमीभाव नसल्याने मुद्दल खर्चही निघत नाही.- वसंत तनपुरे (गोनवडी)कांदालागवडीसाठी येणारा खर्च, पाणी, औषधे आणि मजुरीही निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गेले चार महिने कांदालागवड केल्यापासून कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा होती. मात्र, बाजारात कांद्याची प्रचंड आवक होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले आहे.- भरत हुंडारे (पिंपरी बुद्रुक)