शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

तरुण पिढीच उज्ज्वल राष्ट्र घडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:11 IST

पुणे : आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या देशातील तरुणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. देशातील तरुण पिढीचा योग्य प्रकारे उपयोग करून ...

पुणे : आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या देशातील तरुणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. देशातील तरुण पिढीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतल्यास एक उज्ज्वल राष्ट्र घडवण्यास नक्कीच मदत होईल. तसेच केंद्र शासनातर्फे ‘नवीन युवा धोरण’ तयार केले जात असून ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणचा विस्तार असेल. त्यात तंदुरुस्ती आणि खेळ यावर अधिक जोर देण्यात येईल, असे केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

सिम्बायोसिस सेंटर फॉर इमोशनल वेल-बिइंग, एसआययू व एमपॉवर यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत किरेन रिजिजू बोलत होते. यावेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर ,कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, एमपॉवरच्या संस्थापक नीरजा बिर्ला, सिम्बायोसिस विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरावडेकर, गिरिजा महाले आदी उपस्थित होते.

रिजीजू म्हणाले, भारताला एक उत्तम क्रीडा राष्ट्र बनवायचे असून त्यासाठीच ‘खेलो इंडिया’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्यात विद्यापीठ स्तरावर खेळले जाणारे खेळ हे जागतिक दर्जाचे आहेत. तसेच केंद्र शासनाने ‘फिट इंडिया’ मोहीम सुरू केली असून त्यासाठी भारतातील विद्यापीठांनी नेतृत्त्वाची भूमिका घ्यावी.

भारत विकसनशील राष्ट्र असून ‌येथे सर्वत्र स्पर्धात्मक वातावरण आहे. त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होते; तेव्हाच ती जीवनाच्या सर्व बाबींमध्ये यशस्वी होते. केवळ क्रीडा क्षेत्रातीलच व्यक्ती नव्हे तर प्रत्येक भारतीय व्यक्ती तंदुरुस्त असायला हवी, असेही रिजीजू यांनी सांगितले.