शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

पालखी महामार्गावरील लासुर्णेच्या नियोजित उड्डाणपूल उभारणीला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 6:04 PM

बंदिस्त उड्डाणपुलामुळे रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाताना अगदी अर्धा किलोमीटर, एक किलोमीटरवरून वळसा घालून जावे लागणार आहे...

लासुर्णे (पुणे) : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी लासुर्णे येथे तीन उड्डाणपूल नियोजित आहेत. या पुलांमुळे दोन भागात गाव विभागले जाणार आहे. येथील व्यवसाय कोलमडणार असल्याने ग्रामस्थांनी या उड्डाणपुलाला विरोध दर्शवला आहे. संपूर्ण गावासह महिला, लहान मुलांसह रस्त्यावर उतरत आमरण उपोषण करू, असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे.

लासुर्णे (ता. इंदापूर)येथील ऋतुजा पेट्रोलपंपावर पालखी मार्गाच्या अडीअडचणी संदर्भात बैठक पार पडली. यावेळी ग्रामस्थांनी हा इशारा दिला. बंदिस्त उड्डाणपुलामुळे रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाताना अगदी अर्धा किलोमीटर, एक किलोमीटरवरून वळसा घालून जावे लागणार आहे. लासुर्णे गाव हे बारा वाड्या आणि तेरा गावे अशा गावांचा व्यवहार बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी पतसंस्था व विविध कार्यकारी संस्था अशा अनेक संस्थांचे जाळे या गावात आहे. या सर्वांवर परिणाम होणार असल्याचे सांगत पुलाला विरोध करण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षा विभागाच्या अधिकारी उमादेवी यांनी सांगितले की या महामार्गाचा सर्व्हे २०१८ मध्ये करण्यात आला आहे. यात २०३० पर्यंतची लोकसंख्या तसेच नवीन वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेण्यात आली आहे. तसेच चिखली, कुरवली कळंब व बोरी आदी गावातील नागरिक लासुर्णे गावातून जातात. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ व वाहनांच्या रांगा लागतील. भविष्यात अपघाताचे प्रमाण वाढेल हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून तीन उड्डाणपुलांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.

यावर सरपंच पाटील यांनी सांगितले की चिखली कुरवली गावातील नागरिक बी.के.बी. एन. मार्गे पंढरपूर तसेच बारामती या ठिकाणी जातील. तसेच कळंब गावातील नागरिक सुद्धा त्याच मार्गाने जातील. त्याचप्रमाणे बोरी गावातील नागरिकांसाठी भवानीनगर तसेच बारामतीस जाण्यासाठी वेगळा मार्ग आहे. या चारही गावातील नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी लासुर्णेत येण्याचा काहीच संबंध नाही. त्यामुळे या रस्त्यावर त्या नागरिकांची गर्दी होण्याचा प्रश्नच येत नाही. या सर्व कारणामुळे आमच्या गावातील उड्डाणपूल हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सरपंच पाटील यांनी ग्रामस्थांच्यावतीने केल्याचे सांगितले.

हा पालखी महामार्ग झाला पाहिजे. महामार्गामुळे गावाचा विकास होतो. हे जरी खरे असले तरी या गावातील तीन उड्डाणपुलांमुळे गावचे गावपण हरवले जाणार आहे. गाव दोन भागात विभागले जाणार आहे. अनेकांचे व्यवसाय अडचणीत येणार आहेत. यासाठी प्रशासनाला आमची गावकऱ्यांच्यावतीने उड्डाणपूल रद्द करण्यात यावा, अशी मागणी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे तसेच नॅशनल हायवे महामार्गाचे सर्व अधिकारी यांच्याकडे केली. भविष्यात तो उड्डाणपूल रद्द न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशारा सरपंच रुद्रसेन पाटील यांनी दिला. तर ग्रामस्थांची मागणी वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले.

... चित्रगुप्त जे लिहितो, ते इंद्रदेव करतो,

ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या बैठकीत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना चित्रगुप्त जे लिहितो, ते इंद्रदेव करतो, या आशयाप्रमाणे तुम्ही फक्त कागदावर आमच्या मागणीबाबत लिहा, ते आपोआप होऊन जाईल,अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यावर नागरिकांमध्ये एकच हशा पिकला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा